शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र १४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र याही ...

हिंगोली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र १४ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र याही वर्षी कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, हे सांगणे कठीण आहे. सध्याची स्थिती पाहता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षभरापासून प्राथमिक शाळा बंदच आहेत. मोजकेच दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग भरले होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणावरच भर दिला होता. अखेरीस आरटीई अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ मे ते १३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यामुळे १४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाला आळा बसेल, असा विश्वास शासनाला आहे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण झाल्यास शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्या वेळची कोरोना संसर्ग व लसीकरणाची स्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मत शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

२२ हजार विद्यार्थी थेट दुसरीत

- कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच आरटीई अंतर्गत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- जिल्ह्यातील २२ हजार ८५२ विद्यार्थी पहिलीत शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी आता थेट दुसरीत गेले आहेत.

- शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला आखावे लागणार आहे.

- हे विद्यार्थी थेट दुसरीत गेले असले तरी एकही दिवस शाळेत गेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी दुसरीत गेले तरी शाळेत पहिल्यांदाच जाणार आहेत.

शिक्षण तज्ज्ञ म्हणतात...

सध्या लहान मुलांना कोरोना होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. कोरोना संसर्गाची अशीच स्थिती राहिल्यास शाळा सुरू करताना सर्वच बाजूंनी विचार करावा लागणार आहे. त्या वेळची कोरोना स्थिती पाहूनच शिक्षण विभाग निर्णय घेईल, असेही शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!

विद्यार्थी प्रतिक्रिया...

मागील वर्षी काही दिवसच शाळेत जाता आले. ऑनलाइन अभ्यास घेतला जात होता. मात्र वर्गात शिक्षकांनी शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू कराव्यात.

- ऋतुराज वाढवे, विद्यार्थी

या वर्षी शाळा सुरू झाल्यास पाल्याला शाळेत नक्कीच पाठविणार. वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यामुळे घरात राहून ती कंटाळली आहेत. मुले एकलकोंडी होण्याचीही भीती वाटत आहे.

- रवी गंगावणे, पालक

शाळा तर सुरू व्हायलाच हव्यात. मात्र कोरोना लसीकरण मोहिमेवरही बरेच काही अवलंबून आहे. सध्या तरी जुनी पुस्तके परत घेणे, टी.सी. तयार करणे आदी कामे सुरू आहेत.

- संतोष खंदारे, प्राथमिक शिक्षक