शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:17 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केली आहे.

हिंगोली : राजस्थान येथील शेकडो नागरिक सध्या प्रशासनाच्या देखरेखीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने ते अडकून पडले होते. त्यांना हिंगोलीत आणल्यानंतर लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, असा आग्रह हे नागरिक करीत आहेत. २९ मार्च रोजी हे सर्व नागरिक अचानक रस्त्यावर आल्याने गोंधळ उडाला होता.

त्यामुळे लिंबाळा परिसरातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे ३९६ राजस्थानी मजुर कामाच्या शोधात राजस्थानमधून स्थलांतरित झाले होते. या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाकापर्यंत अंतर कापले. परंतु वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले. या सर्व मजुरांना प्रशासनाने ताब्यात घेतले. परंतु या मजुरांना आता ठेवायचे तरी कोेठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हिंगोली शहरालगतच्या लिंबाळा मक्ता परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे या शेकडो मजुरांच्या भोजनाची व राहण्यची सुविधा करण्यात आली. परंतु हे नागरिक आता गावाकडे जायचे आहे, असे सांगत गर्दी करीत असल्याने प्रश्न गंभीर बनला आहे.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेलाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांना भोजन व सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी त्यांनी रविवारी गोंधळ घातल्याने लिंबाळा गावातील नागरिकांना तसेच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. वारंवार गोंधळ घालत हा मजुरवर्ग रस्त्यावर येत असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थान येथील ३९६ मजुर प्रशासनाच्या देखरेखीत आहेत, त्यांना कुठलाही आजार नाही. ते आमच्या गावी जायचे आहेत, असे म्हणत आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचे आदेश लागू असल्याने ते शक्य नाही. त्यांच्या भोजनाची व राहण्याची सुविधा केली असली तरी, त्यातील काही मजुर गावी जायच आहे असा आग्रह करीत आहेत. या सर्व नागरिकांची दरदिवशी भेट घेऊन त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. लिंबाळा मक्ता परिसरातील नागरिकांनीही घराबाहेर पडू नये शिवाय सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घ्यावी. - अतुल चोरमारे, पविभागीय अधिकारी हिंगोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली