शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:17 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केली आहे.

हिंगोली : राजस्थान येथील शेकडो नागरिक सध्या प्रशासनाच्या देखरेखीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने ते अडकून पडले होते. त्यांना हिंगोलीत आणल्यानंतर लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, असा आग्रह हे नागरिक करीत आहेत. २९ मार्च रोजी हे सर्व नागरिक अचानक रस्त्यावर आल्याने गोंधळ उडाला होता.

त्यामुळे लिंबाळा परिसरातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे ३९६ राजस्थानी मजुर कामाच्या शोधात राजस्थानमधून स्थलांतरित झाले होते. या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाकापर्यंत अंतर कापले. परंतु वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले. या सर्व मजुरांना प्रशासनाने ताब्यात घेतले. परंतु या मजुरांना आता ठेवायचे तरी कोेठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हिंगोली शहरालगतच्या लिंबाळा मक्ता परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे या शेकडो मजुरांच्या भोजनाची व राहण्यची सुविधा करण्यात आली. परंतु हे नागरिक आता गावाकडे जायचे आहे, असे सांगत गर्दी करीत असल्याने प्रश्न गंभीर बनला आहे.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेलाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांना भोजन व सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी त्यांनी रविवारी गोंधळ घातल्याने लिंबाळा गावातील नागरिकांना तसेच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. वारंवार गोंधळ घालत हा मजुरवर्ग रस्त्यावर येत असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थान येथील ३९६ मजुर प्रशासनाच्या देखरेखीत आहेत, त्यांना कुठलाही आजार नाही. ते आमच्या गावी जायचे आहेत, असे म्हणत आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचे आदेश लागू असल्याने ते शक्य नाही. त्यांच्या भोजनाची व राहण्याची सुविधा केली असली तरी, त्यातील काही मजुर गावी जायच आहे असा आग्रह करीत आहेत. या सर्व नागरिकांची दरदिवशी भेट घेऊन त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. लिंबाळा मक्ता परिसरातील नागरिकांनीही घराबाहेर पडू नये शिवाय सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घ्यावी. - अतुल चोरमारे, पविभागीय अधिकारी हिंगोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली