शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

ठळक मुद्देकामाच्या शोधात राजस्थानला गेले होते मजूर

कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : कामाच्या शोधात हैदराबादला गेलेल्या राजस्थानच्या मजुरांचे एक-दोन नव्हे, तब्बल आठ ट्रक कनेरगाव नाका सीमेवर अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

जवळपास तीनशे ते साडेतीनशे मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. ठणठणीत असल्याने सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाशिम प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुढे रवानगी केली.कामाच्या शोधात राजस्थानमधून मजूर देशाच्या विविध भागात स्थलांतरित होतात. राजस्थानच्या या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथपर्यंतचे अंतर कापले. त्यांना मध्ये कोणी सीमाबंदीतही अडविले नाही म्हणून की, पर्यायी मार्ग शोधून ते इथपर्यंत आले हे कळायला मार्ग नाही. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यातही आधी एक, मग दुसरा असे सात ते आठ ट्रक दुपारपर्यंत दाखल झाले. त्यामुळे एवढ्या लोकांना कसे ठेवायचे म्हणून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. तर वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले आहेत. या ठिकाणी ट्रकधील सर्व मजूर खाली उतरविण्यात आले व त्यांना बाजूला एका ठिकाणी बसविले.

या घटनेची माहिती गोरेगाव येथील ठाणेदारास कळविली. ठाणेदार श्रीमनवार येथे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर डॉ.नामदेव कोरडे हे आरोग्य पथकासह तपासणी करीत आहेत. तलाठी चौधरीही येथे दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तपासणी संपली नव्हती.ठेवायचे कोठे?या लोकांना आता ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला होता. गावातील शाळेत व्यवस्था करण्यास ग्रामस्थही तयार नव्हते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना तसेच पुढे पाठवण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथील प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर ही मंडळी पुढे मार्गस्थ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली