शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण...
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
4
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
5
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
6
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
7
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
8
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
9
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
10
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
11
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
12
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
13
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
14
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
15
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
16
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
17
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
18
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
19
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
20
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

ठळक मुद्देकामाच्या शोधात राजस्थानला गेले होते मजूर

कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : कामाच्या शोधात हैदराबादला गेलेल्या राजस्थानच्या मजुरांचे एक-दोन नव्हे, तब्बल आठ ट्रक कनेरगाव नाका सीमेवर अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

जवळपास तीनशे ते साडेतीनशे मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. ठणठणीत असल्याने सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाशिम प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुढे रवानगी केली.कामाच्या शोधात राजस्थानमधून मजूर देशाच्या विविध भागात स्थलांतरित होतात. राजस्थानच्या या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथपर्यंतचे अंतर कापले. त्यांना मध्ये कोणी सीमाबंदीतही अडविले नाही म्हणून की, पर्यायी मार्ग शोधून ते इथपर्यंत आले हे कळायला मार्ग नाही. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यातही आधी एक, मग दुसरा असे सात ते आठ ट्रक दुपारपर्यंत दाखल झाले. त्यामुळे एवढ्या लोकांना कसे ठेवायचे म्हणून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. तर वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले आहेत. या ठिकाणी ट्रकधील सर्व मजूर खाली उतरविण्यात आले व त्यांना बाजूला एका ठिकाणी बसविले.

या घटनेची माहिती गोरेगाव येथील ठाणेदारास कळविली. ठाणेदार श्रीमनवार येथे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर डॉ.नामदेव कोरडे हे आरोग्य पथकासह तपासणी करीत आहेत. तलाठी चौधरीही येथे दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तपासणी संपली नव्हती.ठेवायचे कोठे?या लोकांना आता ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला होता. गावातील शाळेत व्यवस्था करण्यास ग्रामस्थही तयार नव्हते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना तसेच पुढे पाठवण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथील प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर ही मंडळी पुढे मार्गस्थ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली