शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

कोरोना वाढला; एसटीचे प्रवासी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने प्रवासी संख्येतही घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने प्रवासी संख्येतही घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने चालक, वाहकांना मास्क घालणेही बंधनकारक केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी असे तीन आगार आहेत. कोरोना आधी एसटी महामंडळाची तिन्ही आगारांची रोजची प्रवासी संख्या ७० हजारांच्या जवळपास होती. सद्य:स्थतीत ही संख्या अर्ध्यावरच आहे. जिल्ह्यातील हिंगोली आगारातून ६ हजार ५००, वसमत आगारातून ७ हजार तर कळमनुरी आगारातून ५ हजार ५०० प्रवासी रोज प्रवास करतात. लॉकडाऊन खुला केल्यानंतरही संख्या थोडी वाढली होती, परंतु सद्य:स्थितीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने, प्रवासी संख्या कमी हाेत असल्याने महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी कोरोनाचे १९ रुग्ण वाढले. हे पाहून एसटी महामंडळाने प्रत्येक बसेसच्या चालक-वाहकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. चालक-वाहकांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय चढू देऊ नये, अशा सूचनाही दिल्याचे स्थानकप्रमुख संजयकुमार पुुंडगे यांनी सांगितले.

बॉक्स

ना मास्क, ना सामाजिक अंतर

एसटी महामंडळाने चालक, वाहकांना मास्क घालणे महामंडळाने बंधनकारक केले असले, तरी चालक-वाहक मास्क न घालताच प्रवांशासोबत प्रवास करत आहेत. खरे पाहिले तर चालक-वाहकांनी स्वत: मास्क घालून प्रवाशांनाही मास्क घालणे बंधनकारक केले पाहिजे. कोरोना वाढत असताना चालक-वाहक प्रवाशांची का काळजी घेत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे.

बॉक्स

पाच ठिकाणी निम्मे प्रवासी

पंधरा-वीस दिवसांअगोदर कोरोनाचे प्रमाण कमी होते, परंतु आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नाही म्हटले, तरी प्रवासी संख्येत घट होताना दिसून येत आहे. जांभरुण, खिल्लार, भोसी, गाडीबोरी, गांगलवाडी, चिखली आदी ग्रामीण भागांत प्रवासी निम्म्यांवरच आले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बसेस सुरू, पण प्रवाशांच्या काळजीचे काय?

लॉकडाऊन सुरू होते. त्या हिंगोली आगारातील सर्वच बसेस बंद होत्या. त्यानंतर, लॉकडाऊन खुला केल्यानंतर आगाराने बसेस सुरू केल्या आहेत. तेव्हापासून आजतागायत बसेस सुरू आहेत. सध्या चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे, तेव्हा एसटी महामंडळाने रोजच्या रोज बसेस धुऊन त्यात सॅनिटायझरची फवारणी करणे बंधनकारक आहे, परंतु तसे काही होताना दिसून येत नाही.

जिल्ह्यातील एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या

६०,०००

लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या

१५,०००

एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या

२०,०००