शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

कोरोनामुळे वाजंत्री व्यावसायिकांवर उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

हिंगोली : ज्या व्यवसायांवर कुटुंबाचा गाडा चालतो तोच व्यावसाय कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद पडला आहे. उदरनिर्वाहाचे साधनच सद्य:स्थितीत ...

हिंगोली : ज्या व्यवसायांवर कुटुंबाचा गाडा चालतो तोच व्यावसाय कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद पडला आहे. उदरनिर्वाहाचे साधनच सद्य:स्थितीत बंद पडल्याने सर्व साहित्य गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा वाजंत्री व्यावसायिकांनी मांडली.

२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला आहे. तेव्हापासून वाजंत्री व्यावसायिकांची उपासमार होत आहे. लग्न, विविध धार्मिक कार्यक्रम असले की वाजंत्री व्यावसायिकांना सुगीचे दिवस असायचे. परंतु सध्या सर्वच कार्यक्रम बंद असल्यामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कोरोनाआधी दिवसाकाठी हजार ते दीड हजार रुपये हातात पडायचे. परंतु, गत दोन वर्षांपासून तेही हातात पडत नाही. सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे वाद्य गुंडाळून ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे. वाजंत्री प्रमुखांसह सहकाऱ्यांनाही उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात वाजंत्री व्यावसायिक नाही म्हटले तरी दीडशेच्या आसपास तर हिंगोली शहरात पन्नास ते साठ आहेत. गतवर्षी शासनाने माणसी पाच किलो धान्य दिले होते. परंतु, यावर्षी मात्र काहीही दिले नाही. मोठी माणसे कशीही राहू शकतात. परंतु, लहान मुले उपाशी कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गतवर्षीही लग्न तिथी भरपूर प्रमाणात होत्या. एप्रिल महिन्यात ८ तिथी होत्या. मे महिन्यात १६ तिथी आहेत. परंतु, कोरोना महामारीमुळे याही तिथी हातच्या जात आहेत. येणाऱ्या जून महिन्यात ८ तिथी आहेत. सदरील ८ तिथी पदरात पडतात की नाही, याची चिंता लागली आहे. शासनाने घरगुती कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

वाजंत्री व्यावसाय बंद पडल्यामुळे कुटुंबाची उपासमार होत आहे. घरात नाही म्हटले तरी पाच ते सहा सदस्य आहेत. जिल्ह्यात वाजंत्री व्यावसायिकही भरपूर प्रमाणात आहेत. शासनाने वाजंत्री व्यावसायिकांना आर्थिक मदत करून त्यांची उपासमार थांबवावी.

-प्रसाद डोके, वाजंत्री व्यावसायिक

फोटो १