शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वादळीवारे लक्षात घेता शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात २४ मार्च रोजी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अस अंदाज ‘वनामकृ’ ...

हिंगोली : जिल्ह्यात २४ मार्च रोजी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अस अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेव विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी आणि करडई या पिकांची लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढणी करुन सर्व पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जेणे करुन पिकांची नासाडी होणार नाही. पिकांचा ढीग केला असल्यास त्यास ताडपत्रीने झाकून ठेवावे. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे वेगाने सुरु आहेत.

वादळी वारा आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. जनावरांच्या गोठ्याच्या छतावर उसाचे पाचट किंवा तुराट्या टाकाव्यात. जेणेकरुन पशुधनाला हानी पोहोचणार नाही. शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट सुरु असेल त्यावेळी झाडाच्या खाली उभे राहू नये. त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यता असते.

जनावरांचा चारा घरातच ठेवावा

पावसात भिजलेला चारा जनावरे खाण्यास नकार देतात. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चारा हा पावसात भिजणार नाही, अशा ठिकाणी म्हणजे घरात ठेवावा. चारा भिजल्यास त्याची प्रत खालावून जाते.