शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

वादळीवारे लक्षात घेता शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात २४ मार्च रोजी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अस अंदाज ‘वनामकृ’ ...

हिंगोली : जिल्ह्यात २४ मार्च रोजी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अस अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेव विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी आणि करडई या पिकांची लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढणी करुन सर्व पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जेणे करुन पिकांची नासाडी होणार नाही. पिकांचा ढीग केला असल्यास त्यास ताडपत्रीने झाकून ठेवावे. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे वेगाने सुरु आहेत.

वादळी वारा आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. जनावरांच्या गोठ्याच्या छतावर उसाचे पाचट किंवा तुराट्या टाकाव्यात. जेणेकरुन पशुधनाला हानी पोहोचणार नाही. शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट सुरु असेल त्यावेळी झाडाच्या खाली उभे राहू नये. त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यता असते.

जनावरांचा चारा घरातच ठेवावा

पावसात भिजलेला चारा जनावरे खाण्यास नकार देतात. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चारा हा पावसात भिजणार नाही, अशा ठिकाणी म्हणजे घरात ठेवावा. चारा भिजल्यास त्याची प्रत खालावून जाते.