शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा अवैध धंद्यांना वरदहस्त; आमदाराचा आरोप

By विजय पाटील | Updated: February 23, 2024 12:35 IST

महिनाभरापासून मी वारंवार तक्रार करीत असताना प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने या अवैध धंद्यांना त्यांचा पूर्ण वरदहस्त असून ते व्यवसाय करणाऱ्यांशी मिळाले आहेत, असा आरोप मुटकुळे यांनी केला.

हिंगोली : जिल्हा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नसल्याने जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून बदलीचा अर्ज करून आमचा जिल्हा नासवला जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रशासनाला सुनावले. 

जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून, हे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी आमदार तान्हाजी  मुटकुळे यांनी २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनातच उपोषण सुरू केले आहे. मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. परंतु कोणताही अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. सदरील अवैधंदे बंद करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा सांगण्यात आले. परंतु त्याकडेही कानाडोळा केला गेला. त्यामुळे तर आज उपोषण करण्याची वेळ येत आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नसल्यामुळे मी आजपासून जिल्हाधिकारी यांच्या दालनातच उपोषण करत आहे, असे  आमदार मुटकुळे म्हणाले.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात किती वाहने तपासणी व किती पकडली हेही, प्रशासनाला सांगता आले नाही. आरटीओंनी त्यांच्याकडे वाळू वाहतुकीसाठी किती वाहनांची नोंद झाली याची माहिती दिली नाही. तसेच विनाक्रमांक वाहने वाळूसाठी वापरली जात असताना का कारवाई होत नाही, असेही मुटकुळे यांनी विचारले. आरटीओंना काही सांगता आले नसल्याने आरटीओ अनंत जोशी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवा असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले. महिनाभरापासून मी वारंवार तक्रार करीत असताना प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने या अवैध धंद्यांना त्यांचा पूर्ण वरदहस्त असून ते व्यवसाय करणाऱ्यांशी मिळाले आहेत, असा आरोप मुटकुळे यांनी केला.

मटका, वाळू, गुटखा, रेती बिनधास्त सुरू असल्याचे ते म्हणाले. हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी  धरलेले टिप्पर सोडल्याने त्यांच्यावर कारवाई म्हणून आजच्या आज कार्यमुक्त करा, असेही ते म्हणाले. तर हे टिप्पर पकडून त्या टिप्परमालकार मोक्का लावण्याची मागणीही केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा, पप्पू चव्हाण, विजय धाकतोडे, संतोष टेकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.