शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महावितरणच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:03 IST

शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्यांना नागरिक वैतागून गेले आहेत. शहरातील रात्री-अपरात्री वीज बंद होते. दिवसाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज समस्यांकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष आहे. दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष भेटून वीज समस्येबाबत विचारणा केली असता केवळ बिल भरणा केला आहे का? असा प्रश्न केला जात असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्यांना नागरिक वैतागून गेले आहेत. शहरातील रात्री-अपरात्री वीज बंद होते. दिवसाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज समस्यांकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष आहे. दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष भेटून वीज समस्येबाबत विचारणा केली असता केवळ बिल भरणा केला आहे का? असा प्रश्न केला जात असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.महावितरणकडून वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा पुरविणे आवश्यक आहे. रोहित्रात बिघाड किंवा वीज उपकरणांचे तांत्रिक कामे सुरू असल्याचे सांगत दिवसभर मध्येच वीजपुरवठा खंडित केला जातो. नेहमीच्या या त्रासाला मात्र आता नागरिक पूर्णत: वैतागून गेले आहेत.दिवाळीच्या ऐन सणासुदीतही वीजेचा प्रश्न४ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किमान दिवाळी सणानिमित्त तरी महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठ्याची अपेक्षा आहे. शहरातील वीज तारांचा गुंत्यामुळेही वीजसेवा वारंवार खंडित होते, असे प्रकाश सोनी यांनी सांगितले.४विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना भारनियमन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने भारनियमन बंद करावे. विशेष म्हणजे ऐन सणासुदीच्या काळामध्ये भारनियमन सुरू असल्यामुळे सरकारची खरी प्रतिमा उघड झाली आहे. अशी प्रतिक्रीया राकाँचे शहराध्यक्ष जावेद राज यांनी दिली.४शहरातील अनेक रोहित्रांत नेहमीच बिघाड होतो. त्यामुळे लाईट अचानक बंद होते. हा प्रकार आता मागील काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे निकामी झालेल्या रोहित्रांची कायमस्वरूपी दुरूस्ती होणे गरजेचे आहे. जेणेकरून वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करता येईल. वीज समस्येकडे संबधित अधिकाºयांनी लक्ष द्यावे.वीज समस्यांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया४वारंवार होणाºया वीजपुरवठा खंडितमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सांगितल्यास लक्षही दिले जात नाही. त्यामुळे हिंगोली शहरातील वीज समस्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गणेश पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.४महावितरणकडून वीज बिल भरणा करण्यास सांगितला जातो. वीज बिल भरूनही ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मात्र केला जात नाही. दिवसातून वीज जाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर महातिवरणने काही तोडगा काढावा व सुरळीत वीजपुरवठा ग्राहकांना करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. अशोक डुब्बेवार यांनी दिली.४हिंगोली शहरातील वीजपुरवठा विस्कळीत होणे हा काही नवा प्रकार नाही. तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या वेळेत दुरूस्त करायला हव्यात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष द्यायला हवे. तसेच अखंडित वीजपुरवठ्याची सेवा वीज ग्राहकांना महावितरणने द्यायला हवी अशी मागणी एएसआय संदीप राठोड यांनी केली.प्रतिसाद नाही...महावितरण कार्यालयातील मुख्य अधिकाºयांकडे वीज ग्राहकांचे प्रश्न पोहोचत नाहीत. त्यामुळे वीज समस्येचा प्रश्न कायम राहतो. हिंगोली तालुक्यातील वीजेचा प्रश्न तर मागील दोन महिन्यांपासून गंभीर बनला आहे. कालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक लाईट गेली होती. वीज ग्राहकांनी याबाबत संबंधित अधिकाºयास वारंवार फोनही लावले. परंतु प्रतिसादच मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वरिष्ठ अधिकाºयांनी ग्राहकांच्या वीज समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोली