शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

चायनीज खाता की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

हिंगोली: गत काही वर्षांपासून चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण शहराच्या ठिकाणी वाढलेले पहायला मिळत आहे. विरंगुळा म्हणून पदार्थ खाल्ले ...

हिंगोली: गत काही वर्षांपासून चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण शहराच्या ठिकाणी वाढलेले पहायला मिळत आहे. विरंगुळा म्हणून पदार्थ खाल्ले तर ते काही वाईट नाही,परंतु नेहमीच जर चायनीज खाल्ले तर आजारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. तेव्हा चायनीजपासून सावध रहावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

सद्य:स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर खाणे हे टाळलेच पाहिजेत. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणतेही जड पदार्थ हे व्यवस्थितरित्या पचत नाहीत. तिखट व जड पदार्थ खाणे टाळल्यास प्रकृती चांगली राहते. हलके पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

काय आहे अजिनोमोटो?

तयार केलेल्या चायनीज पदार्थाला चव यावी म्हणून त्यात अनेक जण ‘अजिनोमोटो’ हे टाकतात. भाजीला चव येऊन तेवढ्या पुरते बरे वाटते. चायनीज पदार्थ चांगले असतात हेही कळायला लागते. परंतु, यामुळे पोटाच्या कॅन्सरची शक्यता जास्त असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे.

...म्हणून चायनीज खाणे टाळा

चायनीज पदार्थामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा मारा जास्त केला जातो. एवढेच काय मिठाचे प्रमाणही जास्त असते. यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामनाही करावा लागतो. तेव्हा मोठ्या व्यक्तीने स्वत:ची काळजी घेत लहान मुलांचीही काळजी घ्यावी. कारण मोठ्याचे अनुकरण लहान मुले करत असतात.

प्रतिक्रिया...

तिन्ही ऋतुंमध्ये हलके पदार्थ खाऊन प्रकृती चांगली ठेवावी. चायनीज पदार्थ खाण्यासाठी बरे वाटतात, परंतु या पदार्थामध्ये ‘अजिनोमोटो’ मिसळून पदार्थाला चव आणली जाते. या प्रकारामुळे रक्तदाब, पोटाचा कॅन्सर तसेच इतर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. तेव्हा हे चायनीज पदार्थ खाण्याचे टाळावे.

-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी