शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:15 IST

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभाग : शासनाकडून निधीस मंजुरी

हिंगोली : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहिर केला असून टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.दहावी बारावतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची यादीनुसार तेथील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जाणार आहेत. शासनाकडून याबाबत शिक्षण विभागास तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यमंडळाकडे एकूण ८ कोटीं ३२ लाख ६८ हजार ९०५ एवढा निधी शिल्लक आहे. या शिल्लक निधीतून राज्यमंडळाने सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील महसूल व वन विभागाने घोषीत केलेल्या राज्यभरातील टंचाईग्रस्त भागातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय त्यानंतरही तरतूद कमी पडल्यास सन २०१८-१९ या वर्षाकरीता ३८०७.३ हजार उपलब्ध तरतूदीमधून शुल्क माफी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परंतु सदर प्रक्रियेस जिल्ह्यात अद्याप सुरूवात करण्यात आली नाही. टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची आकडेवारी जुळवणीचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्येक्षात मात्र कामास अद्याप सुरूवातच झालेली नाही.एका महिन्यात कार्यवाही कराशालेय शिक्षण क्रिडा विभागाच्या १८ आॅक्टोबर १९९३ च्या शासननिर्णयानुसार टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळ जाहिर केलेल्या टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहेत. सदर प्रक्रीया एका महिन्यात पुर्ण करावी अशाही शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातर्फे नियोजन सुरू असल्याचे सांग्ण्यात आले. शिवाय टंचाईग्रस्त गावांच्या संख्येनुसार तेथीलविद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीStudentविद्यार्थीEducationशिक्षण