शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव

By रमेश वाबळे | Updated: February 12, 2024 19:24 IST

पहिल्याच दिवशी ३५७ क्विंटल कापसाची खरेदी

हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागात तब्बल १३ वर्षांनंतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३५७ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली होती. या कापसाला ६ हजार ९२० रुपये भाव मिळाला.

जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु अपेक्षित बाजारपेठ मिळत नसल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यातच हिंगोलीतील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मागील १३ वर्षांपासून बंद होते. हे केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर  मुहूर्त मिळाला आणि १२ फेब्रुवारीपासून केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, राजू खुराणा, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, संतोष टेकाळे, सावरमल अग्रवाल, केंद्रचालक उमेश दाबेराव, वैभव लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले औंढा नागनाथ तालुक्यातील सावंगी येथील शेतकरी अरुण बाबूराव मस्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा...सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर एका एकरातच कापसाचा पेरा नोंद केलेला असेल आणि कापसाचे उत्पादन १२ क्विंटलपेक्षा अधिक असेल, तर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सातबारावर कापूस पेराची नोंद आवश्यक...कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर कापसाचा पेरा नोंदविलेला असेल, तरच केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस पेराची नोंद नाही. त्यांना अडचण येणार आहे, तसेच शेतकऱ्याचे आधार लिंक असणेही आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.

पेरा नोंदीचा प्रश्न मांडला खासदारांकडे...सातबारावर कापूस पेराची नोंद असेल तरच सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. पेराची नोंद नसेल तर कापूस घेतला जाणार नाही. हा प्रश्न केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा. हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडला. त्यावर खा. पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत खरेदी केंद्रावर महसूल प्रशासनाचा एक अधिकारी नियुक्त करून त्या ठिकाणी सातबारावर हस्तलिखित पेरा नोंद करण्यात यावी, असे सांगितले, तसेच केंद्र संचालकांनाही हस्तलिखित पेरा नोंद केलेला असेल, तरीही कापूस खरेदी करावा, अशा सूचना केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली