शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव

By रमेश वाबळे | Updated: February 12, 2024 19:24 IST

पहिल्याच दिवशी ३५७ क्विंटल कापसाची खरेदी

हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागात तब्बल १३ वर्षांनंतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३५७ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली होती. या कापसाला ६ हजार ९२० रुपये भाव मिळाला.

जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु अपेक्षित बाजारपेठ मिळत नसल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यातच हिंगोलीतील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मागील १३ वर्षांपासून बंद होते. हे केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर  मुहूर्त मिळाला आणि १२ फेब्रुवारीपासून केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, राजू खुराणा, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, संतोष टेकाळे, सावरमल अग्रवाल, केंद्रचालक उमेश दाबेराव, वैभव लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले औंढा नागनाथ तालुक्यातील सावंगी येथील शेतकरी अरुण बाबूराव मस्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा...सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर एकरी १२ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर एका एकरातच कापसाचा पेरा नोंद केलेला असेल आणि कापसाचे उत्पादन १२ क्विंटलपेक्षा अधिक असेल, तर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सातबारावर कापूस पेराची नोंद आवश्यक...कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर कापसाचा पेरा नोंदविलेला असेल, तरच केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस पेराची नोंद नाही. त्यांना अडचण येणार आहे, तसेच शेतकऱ्याचे आधार लिंक असणेही आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.

पेरा नोंदीचा प्रश्न मांडला खासदारांकडे...सातबारावर कापूस पेराची नोंद असेल तरच सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. पेराची नोंद नसेल तर कापूस घेतला जाणार नाही. हा प्रश्न केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा. हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडला. त्यावर खा. पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत खरेदी केंद्रावर महसूल प्रशासनाचा एक अधिकारी नियुक्त करून त्या ठिकाणी सातबारावर हस्तलिखित पेरा नोंद करण्यात यावी, असे सांगितले, तसेच केंद्र संचालकांनाही हस्तलिखित पेरा नोंद केलेला असेल, तरीही कापूस खरेदी करावा, अशा सूचना केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली