शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बस आगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

हिंगोली : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. एक अंकी आणि दोन अंकी संख्या केव्हाच पार केली ...

हिंगोली : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. एक अंकी आणि दोन अंकी संख्या केव्हाच पार केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस अगाारात लावल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली होती. त्यादरम्यानही हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील सर्वच बस आगारात लावल्या होत्या. परजिल्ह्यातून येणाऱ्या बस मात्र चालू होत्या. आजमितीस तिन्ही आगारांतील बस ज्या-त्या आगारात लावल्या आहेत; परंतु परजिल्ह्यातून येणाऱ्या बस मात्र सुरूच आहेत. बसस्थानकात उतरलेल्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करूनच त्यांना बसस्थानकाच्या बाहेर पाठविले जात आहे.

२९ मार्च रोजी संचारबंदीचा दिवस होता. पहिल्या दिवशी बसस्थानकात थोडी वर्दळ होती. संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानकात पाच-सहा प्रवासी पाहायला मिळत होते. अँटिजन तपासणीच्या ठिकाणी रोज पाच-सहा कर्मचारी असायचे; परंतु प्रवाशांची वर्दळ नसल्यामुळे दोनच कर्मचारी अँटिजन तपासणीच्या ठिकाणी पाहायला मिळाले. परजिल्ह्यातून आलेल्या बसमधील प्रवाशांची अँटिजन तपासणी डॉ. नाविद अथकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधा सपकाळ, भाग्यश्री राऊत, आशिष देशमुख करताना दिसून आले.

बसथांबे बंद करावेत

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून बस बंद करण्यात आलेल्या आहेत; परंतु बाहेरगावच्या बस चालू आहेत. काही प्रवासी वाहक-चालकांना विनंती करून बसथांब्यावर बस थांबवीत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती अधिक बळावू लागली आहे. कारण शेजारच्या परभणी, नांदेड, अकोला, वाशिम आदी जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन न करता परजिल्ह्यातील बस थेट आगारात आणल्या जाऊन प्रवाशांची अँटिजन तपासणी करणे गरजेचे आहे.