शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:12 IST

मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोली : मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा करण्यासाठी या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील दुष्काळ दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, मराठवाड्याला लागलेला दुष्काळवाड्याचा डाग पुसून काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

हिंगोली येथे १२ ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कावड यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, राम कदम, बाबूराव कदम कोहळीकर, श्रीराम बांगर, गणेश बांगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकरी संकटात असताना सर्व नियम, कायदे मोडून सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, त्यांना वर्षाला १८००० हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातून ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. बेरोजगार युवकांसाठीही योजना आणली आहे. महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत अशा योजना आणल्या; पण या योजनांमुळे विरोधकांचे पोट दुखत आहे. या योजना बंद पडतील, असे आरोप केले जाताहेत. सरकारने या योजनांसाठी ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर राज्याच्या विकास झाला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून या योजना आणल्या आहेत. रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळे या योजना फसव्या आहेत, असे म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. या भागातील बळीराजा समृद्ध व्हावा, भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना भोलेनाथ शंकराकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार