शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

फसव्या योजना म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:12 IST

मराठवाड्याचा दुष्काळवाडा डाग पुसून काढणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोली : मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा करण्यासाठी या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील दुष्काळ दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, मराठवाड्याला लागलेला दुष्काळवाड्याचा डाग पुसून काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

हिंगोली येथे १२ ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कावड यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, राम कदम, बाबूराव कदम कोहळीकर, श्रीराम बांगर, गणेश बांगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकरी संकटात असताना सर्व नियम, कायदे मोडून सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, त्यांना वर्षाला १८००० हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातून ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. बेरोजगार युवकांसाठीही योजना आणली आहे. महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत अशा योजना आणल्या; पण या योजनांमुळे विरोधकांचे पोट दुखत आहे. या योजना बंद पडतील, असे आरोप केले जाताहेत. सरकारने या योजनांसाठी ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर राज्याच्या विकास झाला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून या योजना आणल्या आहेत. रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळे या योजना फसव्या आहेत, असे म्हणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. या भागातील बळीराजा समृद्ध व्हावा, भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना भोलेनाथ शंकराकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार