शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणाºयांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.हिंगोली जिल्हा हा क्षेत्रफळाने लहान आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेला आजूबाजूच्या दोन जिल्ह्यांतील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. तर लोकसभेसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असली तरीही ती या तीन जिल्ह्यांच्या वादात सर्वसमावेशक चेहरा अजूनही समोर येत नाही. त्यातच विद्यमान खा.राजीव सातव यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पाहता तगडी लढत देणाºयालाच मैदानात उतरविणे क्रमप्राप्त आहे. मोदी लाटेच्या वादळात तेवलेला हा दिवा ही लाट ओसरल्यावर आणखीच प्रखरतेने प्रज्ज्वलित झाला आहे. तसे भाजपकडून माजी खा.शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. सूर्यकांता पाटील या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी नेमके कोण मैदानात उतरेल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. शिवसेनेतही आ.जयप्रकाश मुंदडा, बी.डी. चव्हाण, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावेही नुसतीच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वेगळ्याने लढेल अशी चिन्हे नाहीत. तर बसपा, मनसे, भारिप आदींच्या गोटात सामसूम आहे. मात्र सेना व भाजप एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून वाद उभे राहू शकतात. तर विरोधात लढायचे झाले तरीही या पक्षांनी अजून उमेदवारच समोर न आणल्यास सातवांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही. या पक्षांची तशी रणनीतीही समोर येताना दिसत नाही. तर सातव गुजरातचे प्रभारी झाल्याने लढणार की नाही, हाही प्रश्नच आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुकांचीच अधिक घाई होताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यांना आव्हान देण्यासाठी केवळ काँग्रेसचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे रिंगणात राहतील, असे चित्र वाटत असतानाच राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुतेही जोरदार तयारीला लागले. वडकुते-मुटकुळे वादांनी अनेक कार्यक्रमही गाजले आहेत. शिवाय अधून-मधून भैय्या पाटील गोरेगावकर यांच्याही घिरट्या सुरु आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने दिलीप चव्हाण यांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे गोरेगावकरांनी सेनेचा सेफ मार्ग निवडला आहे. मात्र रामेश्वर शिंदेही सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपचे रामरतन शिंदे यांचीही अधून-मधून चर्चा सुरूच असते. तसे काँग्रेसच्याही विनायकराव देशमुख, रवी पाटील गोरेगावकर आदींची नावे चर्चेत राहतात.कळमनुरी मतदारसंघात तर इच्छुकांची यादी एवढी मोठी आहे की, हा मतदारसंघच या निवडणुकांच्या चर्चेला कारण ठरत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आ.संतोष टारफे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून संतोष बांगर हे रणांगणात उतरणार हे जवळपास दिसत आहे. माजी आ.गजानन घुगे यांनीही भाजपप्रवेश करून आपले मनसुबे स्पष्ट केले. मात्र अ‍ॅड. शिवाजी माने यांचीही लोकसभा की विधानसभा ही भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय या मतदारसंघात युती-आघाडीचे कोणतेच आडाखे न बांधता जो-तो कामाला लागला आहे. यात राष्ट्रवादीचे डॉ.जयदीप देशमुख, रासपचे विनायक भिसे, अपक्ष जि.प.सदस्य अजित मगर आदी अनेकांचा समावेश आहे. हा मतदारसंघ म्हणजे सध्या राजकीय चळवळींचे केंद्र बनला आहे. यात काही इच्छुकांमुळे तर मतदारांचे मनोरंजन होत आहे.वसमत विधानसभा राकॉंचे जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा या दोन माजी मंत्र्यांच्या परंपरागत लढतीतून बाहेर निघेल, अशी सुतराम शक्यता नाही. भाजपचे शिवाजी जाधव यांनी जि.प., पं.स.त चुणूक दाखविली अन् थेट दिल्लीच गाठली. मतदारांना मात्र मुंदडा व दांडेगावकर हे दोनच नेते रोजच्या दिसण्यातले वाटतात. त्यातच राजू पाटील नवघरे हा आणखी एक नवा चेहरा चर्चेत आला की आणला जात आहे, हे कळायला मार्ग नाही.अनेक नव्या चेहºयांचा उदयमागच्या विधानसभेला आघाडी व युती तुटल्याने अनेक नवे चेहरे विधानसभेच्या दृष्टिने राजकारणात उतरले आहेत. तर काहींना यावेळीही तसे काही चित्र निर्माण झाले तर आपला क्रमांक लागेल, असे वाटत आहे. तर काहीजण सध्या काँग्रेसपेक्षा राकाँचे चांगले बळ असल्याने आम्हाला वाढीव जागा मिळतील, असे सांगून काम करीत आहेत.सेना व भाजपलाच जाणार अवघडशिवसेना व भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेकांचे उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून झालेले पक्षप्रवेश भविष्यात एकत्रितपणे लढण्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहेत. काँग्रेस व राकाँसमोरही ही अडचण असली तरीही त्यात मतांचे मोठे अंतर हा फॅक्टर एकाला माघार घेण्यास भाग पाडू शकतो. मात्र ही केवळ एक राजकीय अटकळच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण