शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणाºयांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.हिंगोली जिल्हा हा क्षेत्रफळाने लहान आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेला आजूबाजूच्या दोन जिल्ह्यांतील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. तर लोकसभेसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असली तरीही ती या तीन जिल्ह्यांच्या वादात सर्वसमावेशक चेहरा अजूनही समोर येत नाही. त्यातच विद्यमान खा.राजीव सातव यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पाहता तगडी लढत देणाºयालाच मैदानात उतरविणे क्रमप्राप्त आहे. मोदी लाटेच्या वादळात तेवलेला हा दिवा ही लाट ओसरल्यावर आणखीच प्रखरतेने प्रज्ज्वलित झाला आहे. तसे भाजपकडून माजी खा.शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. सूर्यकांता पाटील या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी नेमके कोण मैदानात उतरेल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. शिवसेनेतही आ.जयप्रकाश मुंदडा, बी.डी. चव्हाण, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावेही नुसतीच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वेगळ्याने लढेल अशी चिन्हे नाहीत. तर बसपा, मनसे, भारिप आदींच्या गोटात सामसूम आहे. मात्र सेना व भाजप एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून वाद उभे राहू शकतात. तर विरोधात लढायचे झाले तरीही या पक्षांनी अजून उमेदवारच समोर न आणल्यास सातवांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही. या पक्षांची तशी रणनीतीही समोर येताना दिसत नाही. तर सातव गुजरातचे प्रभारी झाल्याने लढणार की नाही, हाही प्रश्नच आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुकांचीच अधिक घाई होताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यांना आव्हान देण्यासाठी केवळ काँग्रेसचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे रिंगणात राहतील, असे चित्र वाटत असतानाच राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुतेही जोरदार तयारीला लागले. वडकुते-मुटकुळे वादांनी अनेक कार्यक्रमही गाजले आहेत. शिवाय अधून-मधून भैय्या पाटील गोरेगावकर यांच्याही घिरट्या सुरु आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने दिलीप चव्हाण यांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे गोरेगावकरांनी सेनेचा सेफ मार्ग निवडला आहे. मात्र रामेश्वर शिंदेही सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपचे रामरतन शिंदे यांचीही अधून-मधून चर्चा सुरूच असते. तसे काँग्रेसच्याही विनायकराव देशमुख, रवी पाटील गोरेगावकर आदींची नावे चर्चेत राहतात.कळमनुरी मतदारसंघात तर इच्छुकांची यादी एवढी मोठी आहे की, हा मतदारसंघच या निवडणुकांच्या चर्चेला कारण ठरत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आ.संतोष टारफे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून संतोष बांगर हे रणांगणात उतरणार हे जवळपास दिसत आहे. माजी आ.गजानन घुगे यांनीही भाजपप्रवेश करून आपले मनसुबे स्पष्ट केले. मात्र अ‍ॅड. शिवाजी माने यांचीही लोकसभा की विधानसभा ही भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय या मतदारसंघात युती-आघाडीचे कोणतेच आडाखे न बांधता जो-तो कामाला लागला आहे. यात राष्ट्रवादीचे डॉ.जयदीप देशमुख, रासपचे विनायक भिसे, अपक्ष जि.प.सदस्य अजित मगर आदी अनेकांचा समावेश आहे. हा मतदारसंघ म्हणजे सध्या राजकीय चळवळींचे केंद्र बनला आहे. यात काही इच्छुकांमुळे तर मतदारांचे मनोरंजन होत आहे.वसमत विधानसभा राकॉंचे जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा या दोन माजी मंत्र्यांच्या परंपरागत लढतीतून बाहेर निघेल, अशी सुतराम शक्यता नाही. भाजपचे शिवाजी जाधव यांनी जि.प., पं.स.त चुणूक दाखविली अन् थेट दिल्लीच गाठली. मतदारांना मात्र मुंदडा व दांडेगावकर हे दोनच नेते रोजच्या दिसण्यातले वाटतात. त्यातच राजू पाटील नवघरे हा आणखी एक नवा चेहरा चर्चेत आला की आणला जात आहे, हे कळायला मार्ग नाही.अनेक नव्या चेहºयांचा उदयमागच्या विधानसभेला आघाडी व युती तुटल्याने अनेक नवे चेहरे विधानसभेच्या दृष्टिने राजकारणात उतरले आहेत. तर काहींना यावेळीही तसे काही चित्र निर्माण झाले तर आपला क्रमांक लागेल, असे वाटत आहे. तर काहीजण सध्या काँग्रेसपेक्षा राकाँचे चांगले बळ असल्याने आम्हाला वाढीव जागा मिळतील, असे सांगून काम करीत आहेत.सेना व भाजपलाच जाणार अवघडशिवसेना व भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेकांचे उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून झालेले पक्षप्रवेश भविष्यात एकत्रितपणे लढण्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहेत. काँग्रेस व राकाँसमोरही ही अडचण असली तरीही त्यात मतांचे मोठे अंतर हा फॅक्टर एकाला माघार घेण्यास भाग पाडू शकतो. मात्र ही केवळ एक राजकीय अटकळच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण