शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणाºयांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.हिंगोली जिल्हा हा क्षेत्रफळाने लहान आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेला आजूबाजूच्या दोन जिल्ह्यांतील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. तर लोकसभेसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असली तरीही ती या तीन जिल्ह्यांच्या वादात सर्वसमावेशक चेहरा अजूनही समोर येत नाही. त्यातच विद्यमान खा.राजीव सातव यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पाहता तगडी लढत देणाºयालाच मैदानात उतरविणे क्रमप्राप्त आहे. मोदी लाटेच्या वादळात तेवलेला हा दिवा ही लाट ओसरल्यावर आणखीच प्रखरतेने प्रज्ज्वलित झाला आहे. तसे भाजपकडून माजी खा.शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. सूर्यकांता पाटील या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी नेमके कोण मैदानात उतरेल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. शिवसेनेतही आ.जयप्रकाश मुंदडा, बी.डी. चव्हाण, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावेही नुसतीच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वेगळ्याने लढेल अशी चिन्हे नाहीत. तर बसपा, मनसे, भारिप आदींच्या गोटात सामसूम आहे. मात्र सेना व भाजप एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून वाद उभे राहू शकतात. तर विरोधात लढायचे झाले तरीही या पक्षांनी अजून उमेदवारच समोर न आणल्यास सातवांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही. या पक्षांची तशी रणनीतीही समोर येताना दिसत नाही. तर सातव गुजरातचे प्रभारी झाल्याने लढणार की नाही, हाही प्रश्नच आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुकांचीच अधिक घाई होताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यांना आव्हान देण्यासाठी केवळ काँग्रेसचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे रिंगणात राहतील, असे चित्र वाटत असतानाच राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुतेही जोरदार तयारीला लागले. वडकुते-मुटकुळे वादांनी अनेक कार्यक्रमही गाजले आहेत. शिवाय अधून-मधून भैय्या पाटील गोरेगावकर यांच्याही घिरट्या सुरु आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने दिलीप चव्हाण यांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे गोरेगावकरांनी सेनेचा सेफ मार्ग निवडला आहे. मात्र रामेश्वर शिंदेही सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपचे रामरतन शिंदे यांचीही अधून-मधून चर्चा सुरूच असते. तसे काँग्रेसच्याही विनायकराव देशमुख, रवी पाटील गोरेगावकर आदींची नावे चर्चेत राहतात.कळमनुरी मतदारसंघात तर इच्छुकांची यादी एवढी मोठी आहे की, हा मतदारसंघच या निवडणुकांच्या चर्चेला कारण ठरत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आ.संतोष टारफे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून संतोष बांगर हे रणांगणात उतरणार हे जवळपास दिसत आहे. माजी आ.गजानन घुगे यांनीही भाजपप्रवेश करून आपले मनसुबे स्पष्ट केले. मात्र अ‍ॅड. शिवाजी माने यांचीही लोकसभा की विधानसभा ही भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय या मतदारसंघात युती-आघाडीचे कोणतेच आडाखे न बांधता जो-तो कामाला लागला आहे. यात राष्ट्रवादीचे डॉ.जयदीप देशमुख, रासपचे विनायक भिसे, अपक्ष जि.प.सदस्य अजित मगर आदी अनेकांचा समावेश आहे. हा मतदारसंघ म्हणजे सध्या राजकीय चळवळींचे केंद्र बनला आहे. यात काही इच्छुकांमुळे तर मतदारांचे मनोरंजन होत आहे.वसमत विधानसभा राकॉंचे जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा या दोन माजी मंत्र्यांच्या परंपरागत लढतीतून बाहेर निघेल, अशी सुतराम शक्यता नाही. भाजपचे शिवाजी जाधव यांनी जि.प., पं.स.त चुणूक दाखविली अन् थेट दिल्लीच गाठली. मतदारांना मात्र मुंदडा व दांडेगावकर हे दोनच नेते रोजच्या दिसण्यातले वाटतात. त्यातच राजू पाटील नवघरे हा आणखी एक नवा चेहरा चर्चेत आला की आणला जात आहे, हे कळायला मार्ग नाही.अनेक नव्या चेहºयांचा उदयमागच्या विधानसभेला आघाडी व युती तुटल्याने अनेक नवे चेहरे विधानसभेच्या दृष्टिने राजकारणात उतरले आहेत. तर काहींना यावेळीही तसे काही चित्र निर्माण झाले तर आपला क्रमांक लागेल, असे वाटत आहे. तर काहीजण सध्या काँग्रेसपेक्षा राकाँचे चांगले बळ असल्याने आम्हाला वाढीव जागा मिळतील, असे सांगून काम करीत आहेत.सेना व भाजपलाच जाणार अवघडशिवसेना व भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेकांचे उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून झालेले पक्षप्रवेश भविष्यात एकत्रितपणे लढण्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहेत. काँग्रेस व राकाँसमोरही ही अडचण असली तरीही त्यात मतांचे मोठे अंतर हा फॅक्टर एकाला माघार घेण्यास भाग पाडू शकतो. मात्र ही केवळ एक राजकीय अटकळच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण