शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणाºयांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.हिंगोली जिल्हा हा क्षेत्रफळाने लहान आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेला आजूबाजूच्या दोन जिल्ह्यांतील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. तर लोकसभेसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असली तरीही ती या तीन जिल्ह्यांच्या वादात सर्वसमावेशक चेहरा अजूनही समोर येत नाही. त्यातच विद्यमान खा.राजीव सातव यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पाहता तगडी लढत देणाºयालाच मैदानात उतरविणे क्रमप्राप्त आहे. मोदी लाटेच्या वादळात तेवलेला हा दिवा ही लाट ओसरल्यावर आणखीच प्रखरतेने प्रज्ज्वलित झाला आहे. तसे भाजपकडून माजी खा.शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. सूर्यकांता पाटील या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी नेमके कोण मैदानात उतरेल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. शिवसेनेतही आ.जयप्रकाश मुंदडा, बी.डी. चव्हाण, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावेही नुसतीच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वेगळ्याने लढेल अशी चिन्हे नाहीत. तर बसपा, मनसे, भारिप आदींच्या गोटात सामसूम आहे. मात्र सेना व भाजप एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून वाद उभे राहू शकतात. तर विरोधात लढायचे झाले तरीही या पक्षांनी अजून उमेदवारच समोर न आणल्यास सातवांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही. या पक्षांची तशी रणनीतीही समोर येताना दिसत नाही. तर सातव गुजरातचे प्रभारी झाल्याने लढणार की नाही, हाही प्रश्नच आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुकांचीच अधिक घाई होताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यांना आव्हान देण्यासाठी केवळ काँग्रेसचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे रिंगणात राहतील, असे चित्र वाटत असतानाच राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुतेही जोरदार तयारीला लागले. वडकुते-मुटकुळे वादांनी अनेक कार्यक्रमही गाजले आहेत. शिवाय अधून-मधून भैय्या पाटील गोरेगावकर यांच्याही घिरट्या सुरु आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने दिलीप चव्हाण यांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे गोरेगावकरांनी सेनेचा सेफ मार्ग निवडला आहे. मात्र रामेश्वर शिंदेही सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपचे रामरतन शिंदे यांचीही अधून-मधून चर्चा सुरूच असते. तसे काँग्रेसच्याही विनायकराव देशमुख, रवी पाटील गोरेगावकर आदींची नावे चर्चेत राहतात.कळमनुरी मतदारसंघात तर इच्छुकांची यादी एवढी मोठी आहे की, हा मतदारसंघच या निवडणुकांच्या चर्चेला कारण ठरत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आ.संतोष टारफे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून संतोष बांगर हे रणांगणात उतरणार हे जवळपास दिसत आहे. माजी आ.गजानन घुगे यांनीही भाजपप्रवेश करून आपले मनसुबे स्पष्ट केले. मात्र अ‍ॅड. शिवाजी माने यांचीही लोकसभा की विधानसभा ही भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय या मतदारसंघात युती-आघाडीचे कोणतेच आडाखे न बांधता जो-तो कामाला लागला आहे. यात राष्ट्रवादीचे डॉ.जयदीप देशमुख, रासपचे विनायक भिसे, अपक्ष जि.प.सदस्य अजित मगर आदी अनेकांचा समावेश आहे. हा मतदारसंघ म्हणजे सध्या राजकीय चळवळींचे केंद्र बनला आहे. यात काही इच्छुकांमुळे तर मतदारांचे मनोरंजन होत आहे.वसमत विधानसभा राकॉंचे जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा या दोन माजी मंत्र्यांच्या परंपरागत लढतीतून बाहेर निघेल, अशी सुतराम शक्यता नाही. भाजपचे शिवाजी जाधव यांनी जि.प., पं.स.त चुणूक दाखविली अन् थेट दिल्लीच गाठली. मतदारांना मात्र मुंदडा व दांडेगावकर हे दोनच नेते रोजच्या दिसण्यातले वाटतात. त्यातच राजू पाटील नवघरे हा आणखी एक नवा चेहरा चर्चेत आला की आणला जात आहे, हे कळायला मार्ग नाही.अनेक नव्या चेहºयांचा उदयमागच्या विधानसभेला आघाडी व युती तुटल्याने अनेक नवे चेहरे विधानसभेच्या दृष्टिने राजकारणात उतरले आहेत. तर काहींना यावेळीही तसे काही चित्र निर्माण झाले तर आपला क्रमांक लागेल, असे वाटत आहे. तर काहीजण सध्या काँग्रेसपेक्षा राकाँचे चांगले बळ असल्याने आम्हाला वाढीव जागा मिळतील, असे सांगून काम करीत आहेत.सेना व भाजपलाच जाणार अवघडशिवसेना व भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेकांचे उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून झालेले पक्षप्रवेश भविष्यात एकत्रितपणे लढण्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहेत. काँग्रेस व राकाँसमोरही ही अडचण असली तरीही त्यात मतांचे मोठे अंतर हा फॅक्टर एकाला माघार घेण्यास भाग पाडू शकतो. मात्र ही केवळ एक राजकीय अटकळच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण