शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतात फवारणी करताना ७१८ शेतक-यांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:43 IST

दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाºया शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना २०१८-१९ या वर्षात तब्बल ७१८ शेतकºयांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राहुल टकले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाºया शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना २०१८-१९ या वर्षात तब्बल ७१८ शेतकºयांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ही आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची शक्यता आहे. पावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकºयांकडून कीटकनाशके फवारली जातात. पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशके वापरतात. ही फवारणी शेतकºयांसाठी जीवघेणी ठरत आहे. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पिकांवरील फवारणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात धाव घेण्याची वेळ शेतकºयांवर येत आहे. फवारणी करताना श्वासाद्वारे कीटकनाशक शरिरात जाते; परंतु ते वेळीच लक्षात येत नाही. कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोळ्यांना जळजळ हा त्रास सुरू होतो. त्यानंतर कीटकनाशकाची बाधा झाल्याचे निदर्शनास येते.फवारणी करताना तोंडाला कापड बांधले तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालता येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे. शेती पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकºयांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून शेतकºयांच्या आरोग्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. २०१८-१९ या वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात ७१८ शेतकरी व शेतमजूर दाखल झाले होते. त्यातील ३२१ रुग्णांची स्थीती गंभीर होती. यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.फवारणी करताना अशी घ्यावी खबरदारीपिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना वाºयाच्या दिशेने फवारणी करावी, कीटकनाशकाचा त्वचेशी संपर्क येवू देवू नये, जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी चश्मा, तोंडाला मास्क अथवा रुमाल या साहित्यांचा वापर करावा. फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा नेमून दिलेल्या मापानुसारच घ्यावी. कीटकनाशकाचे डबे सुरक्षितरीत्या नष्ट केले पाहिजेत. कीटकनाशकाची बाधा झाल्यास तात्काळ ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.रुग्णालयनिहाय संख्याफवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उपचार घेतलेल्या शेतकºयांची संख्या हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय ३२८, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय ८३, सेनगाव ग्रामीण रुग्णालय ३२, औंढा ग्रामीण रुग्णालय ३९, वसमत उपजिल्हा रुग्णालय २१५, आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालय २१ अशा एकूण ७१८ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाली.कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्यास त्या कीटकनाशकासोबतची चिठ्ठी सांभाळून ठेवावी, चिठ्ठीनुसार प्रथमोपचार करुन रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे. कीटकनाशक फवारणी करताना अंगभर कपडे घालावे, डोळ्याला चश्मा लावावा, त्वचेद्वारे कीटकनाशकाचा अंश शरिरात जाणार नाही. याची काळजी घ्यावी, कीटकनाशकाचे प्रमाण शिफारशीनुसार घ्यावे.- किशोर श्रीवास,जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली

टॅग्स :Healthआरोग्यagricultureशेती