शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी मारले, मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:02 IST

शेतकऱ्यांना दिलासा : सिल्लोड तालुक्यात विक्रमी लागवड; ४ हजार पोत्यांची आवक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी मिरचीची विक्रमी लागवड करण्यात आली असून सुरुवातीलाच ३८०० ते ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.शिवना, गोळेगाव, आमठाणा, पानवडोद या मिरचीच्या बाजारपेठेत दररोज तब्बल ४ हजार पोत्यांची आवक येत आहे. पुढील आठवड्यात हीच आवक ८ हजार पोते होईल. गरजेच्या वेळी बँकांनी शेतकºयांना मारले असले तरी मिरचीने तारले आहे. खत, औषधी, मजुरीसाठी शेतकºयांचा हात यामुळे मोकळा झाला आहे. मिरचीने एक प्रकारे शेतकºयांना दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यातील बºयाच शेतकºयांना अजून पीक कर्ज मिळाले नाही, बोंडअळी, पीक विमा मिळाला नाही. अशा संकटाच्या स्थितीत मिरचीने शेतकºयांना दिलासा दिला आहे. नगदी पैसे शेतकºयांना मिळत आहेत. पण हाच भाव स्थिर राहावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.नगदी पीक म्हणून ओळख असणाºया सिल्लोड तालुक्यातील तेजा फोर, ईश्वरी, तेजस्विनी या मिरचीला वाशी, मुंबई, कोलकत्ता, नागपूर बाजारपेठेत मागणी आहे. तेजा फोरला सध्या ३८०० रुपये तर ईश्वरी, तेजस्वीला ४२०० ते ४३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती शिवना येथील व्यापारी सुनील काळे यांनी दिली.ज्या शेतकºयांनी एप्रिल ते मे दरम्यान मिरची लागवड केली. त्यांची मिरची आता निघणे सुरू झाली आहे. पहिला तोडा आधी कमी येतो त्यानंतर दुसरा तोडा दुपटीने वाढतो. मिरची तोडणीसाठी ४ रुपये किलो मजुरी द्यावी लागत आहे. या शिवाय वाशीचे भाडे मिळून १० ते ११ रुपये खर्च येतो. तरीही शेतकºयांच्या हातात २८०० ते ३२०० रुपये पडतात.मिरचीचे लागवडक्षेत्र वाढू लागलेसिल्लोड तालुक्यात सध्या नगदी पीक म्हणून शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. २०१३ मध्ये सिल्लोड तालुक्यात केवळ ५ हेक्टर मिरचीची लागवड झाली होती. त्या तुलनेत २०१४ मध्ये २४६ हेक्टर, २०१५-१७४ हेक्टर, २०१६ -२३८४ हेक्टर, २०१७ मध्ये १७७३ हेक्टर लागवड झाली. यावर्षी तब्बल २६७२ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८९९ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.पाणी कमी पडलेअनेक शेतकºयांना मिरचीसाठी पाणी कमी पडले आहे. विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाझर फुटला नाही. मल्चिंगवर मिरची लागवड केल्याने पावसाचे पाणी बेडवरून खाली वाहून जाते. यामुळे ठिबकनेच पाणी घ्यावे लागते. यामुळे मोठा पाऊस होईल व विहिरीत पाणी येईल, अशी आशा शेतकºयांना आहे. ज्यांनी मल्चिंग लावली नाही, त्यांना सध्या पडत असलेल्या पावसाचा फायदा होत आहे.४ मुख्य बाजारपेठासिल्लोड तालुक्यात मिरची खरेदीच्या चार मुख्य बाजारपेठा आहेत. त्यात मोठी बाजारपेठ म्हणून शिवन्याची ओळख होती. पण यावर्षी शिवना मागे पडले आहे. शिवन्यात दररोज केवळ २५० ते ३०० पोते आवक होत आहे. त्या तुलनेत आमठाणा येथे २ हजार पोते, गोळेगाव येथे ५०० पोते, पानवडोद येथे १ हजार पोते मिरचीची आवक येत आहे. एक पोत्यात ५० ते ५५ किलो मिरची बसते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी