शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

बँकांनी मारले, मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:02 IST

शेतकऱ्यांना दिलासा : सिल्लोड तालुक्यात विक्रमी लागवड; ४ हजार पोत्यांची आवक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी मिरचीची विक्रमी लागवड करण्यात आली असून सुरुवातीलाच ३८०० ते ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.शिवना, गोळेगाव, आमठाणा, पानवडोद या मिरचीच्या बाजारपेठेत दररोज तब्बल ४ हजार पोत्यांची आवक येत आहे. पुढील आठवड्यात हीच आवक ८ हजार पोते होईल. गरजेच्या वेळी बँकांनी शेतकºयांना मारले असले तरी मिरचीने तारले आहे. खत, औषधी, मजुरीसाठी शेतकºयांचा हात यामुळे मोकळा झाला आहे. मिरचीने एक प्रकारे शेतकºयांना दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यातील बºयाच शेतकºयांना अजून पीक कर्ज मिळाले नाही, बोंडअळी, पीक विमा मिळाला नाही. अशा संकटाच्या स्थितीत मिरचीने शेतकºयांना दिलासा दिला आहे. नगदी पैसे शेतकºयांना मिळत आहेत. पण हाच भाव स्थिर राहावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.नगदी पीक म्हणून ओळख असणाºया सिल्लोड तालुक्यातील तेजा फोर, ईश्वरी, तेजस्विनी या मिरचीला वाशी, मुंबई, कोलकत्ता, नागपूर बाजारपेठेत मागणी आहे. तेजा फोरला सध्या ३८०० रुपये तर ईश्वरी, तेजस्वीला ४२०० ते ४३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती शिवना येथील व्यापारी सुनील काळे यांनी दिली.ज्या शेतकºयांनी एप्रिल ते मे दरम्यान मिरची लागवड केली. त्यांची मिरची आता निघणे सुरू झाली आहे. पहिला तोडा आधी कमी येतो त्यानंतर दुसरा तोडा दुपटीने वाढतो. मिरची तोडणीसाठी ४ रुपये किलो मजुरी द्यावी लागत आहे. या शिवाय वाशीचे भाडे मिळून १० ते ११ रुपये खर्च येतो. तरीही शेतकºयांच्या हातात २८०० ते ३२०० रुपये पडतात.मिरचीचे लागवडक्षेत्र वाढू लागलेसिल्लोड तालुक्यात सध्या नगदी पीक म्हणून शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. २०१३ मध्ये सिल्लोड तालुक्यात केवळ ५ हेक्टर मिरचीची लागवड झाली होती. त्या तुलनेत २०१४ मध्ये २४६ हेक्टर, २०१५-१७४ हेक्टर, २०१६ -२३८४ हेक्टर, २०१७ मध्ये १७७३ हेक्टर लागवड झाली. यावर्षी तब्बल २६७२ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८९९ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.पाणी कमी पडलेअनेक शेतकºयांना मिरचीसाठी पाणी कमी पडले आहे. विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाझर फुटला नाही. मल्चिंगवर मिरची लागवड केल्याने पावसाचे पाणी बेडवरून खाली वाहून जाते. यामुळे ठिबकनेच पाणी घ्यावे लागते. यामुळे मोठा पाऊस होईल व विहिरीत पाणी येईल, अशी आशा शेतकºयांना आहे. ज्यांनी मल्चिंग लावली नाही, त्यांना सध्या पडत असलेल्या पावसाचा फायदा होत आहे.४ मुख्य बाजारपेठासिल्लोड तालुक्यात मिरची खरेदीच्या चार मुख्य बाजारपेठा आहेत. त्यात मोठी बाजारपेठ म्हणून शिवन्याची ओळख होती. पण यावर्षी शिवना मागे पडले आहे. शिवन्यात दररोज केवळ २५० ते ३०० पोते आवक होत आहे. त्या तुलनेत आमठाणा येथे २ हजार पोते, गोळेगाव येथे ५०० पोते, पानवडोद येथे १ हजार पोते मिरचीची आवक येत आहे. एक पोत्यात ५० ते ५५ किलो मिरची बसते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी