शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

गत वर्षभरात उद्योगाकडून बँकांना दिलेले प्रस्ताव -७४३ गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव-९३ हिंगोली : ...

गत वर्षभरात उद्योगाकडून बँकांना दिलेले प्रस्ताव -७४३

गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव-९३

हिंगोली : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. परंतु, जिल्हा उद्योग केंद्राकडून पाठविलेले प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळे लाभार्थ्यांत नाराजी दिसून येत आहे.

स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण दहा लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष २०१९-२०२० वर्षासाठी एकूण दहा हजार लाभार्थी घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सन २०१९-२० या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण २०२९ नुसार जाहीर करण्यात आली आहे. ही योजना १ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात तसेच राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरू केली आहे. पण, बँकांकडून या योजनेला जिल्ह्यातील बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून गतवर्षी शहरातील एसबीआय बँक, बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, महाराष्ट्र बँक,पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनियन बँक आदी जवळपास आठ-दहा बँकांना ‘मुख्यमंत्री रोजगार योजने’चे प्रस्ताव पाठविले आहे. २०१९ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडून १७२ व खादी ग्रामोद्योकडून ११७ असे ३४९ चे उद्दिष्ट होते. परंतु, बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या १७२ उद्दिष्टांपैकी ६८ मंजूर केले तर खादी ग्रामोद्योगाच्या ११७ उद्दिष्टांपैकी २६ प्रस्ताव मंजूर केले आहेत. चालू वर्षी (२०१९-२०) जिल्हा उद्योग केंद्राचे २०२, तर खादी ग्रामोद्योगचे १३२ उद्दिष्ट होते. जिल्हा उद्योग केंद्राकडून ७४३ आणि खादी ग्रामोद्योगकडून २१० प्रस्ताव पाठविले होते.

परंतु बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे ९३, तर खादी ग्रामोद्योगचे २३ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

लाभार्थीना आत्मनिर्भर बनविण्यासाठी योजना सुरू केली आहे, परंतु, प्रस्ताव रद्द करताना बँकेकडे पुरेसा पैसा नाही, प्रस्तावात जेवढी कागदपत्रे पाहिजे आहेत ते नाहीत, बँकेत पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, पैसे फेडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? असे एक ना अनेक कारणे देऊन बँका शासनाने सुरू केलेल्या चांगल्या योजनेत खोडा घालत आहेत.

जिल्हा उद्योग व्यवस्थापकांचे मत युवक-युवतींना रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली आहे. आम्ही गतवर्षी ३४९ प्रस्ताव पाठविले. परंतु बँकेने ९३ प्रस्तावच मंजूर केले आहेत. प्रस्ताव पाठविल्यानंतर ते मंजूर करायला पाहिजे. परंतु, बँकांकडून म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा विषय मांडला होता. जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना वेळेत प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

-एस. ए. कादरी व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र