शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

गत वर्षभरात उद्योगाकडून बँकांना दिलेले प्रस्ताव -७४३ गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव-९३ हिंगोली : ...

गत वर्षभरात उद्योगाकडून बँकांना दिलेले प्रस्ताव -७४३

गत वर्षभरात बँकांकडून मंजूर झालेले प्रस्ताव-९३

हिंगोली : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. परंतु, जिल्हा उद्योग केंद्राकडून पाठविलेले प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळे लाभार्थ्यांत नाराजी दिसून येत आहे.

स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण दहा लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष २०१९-२०२० वर्षासाठी एकूण दहा हजार लाभार्थी घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सन २०१९-२० या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण २०२९ नुसार जाहीर करण्यात आली आहे. ही योजना १ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात तसेच राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरू केली आहे. पण, बँकांकडून या योजनेला जिल्ह्यातील बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून गतवर्षी शहरातील एसबीआय बँक, बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, महाराष्ट्र बँक,पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनियन बँक आदी जवळपास आठ-दहा बँकांना ‘मुख्यमंत्री रोजगार योजने’चे प्रस्ताव पाठविले आहे. २०१९ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडून १७२ व खादी ग्रामोद्योकडून ११७ असे ३४९ चे उद्दिष्ट होते. परंतु, बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या १७२ उद्दिष्टांपैकी ६८ मंजूर केले तर खादी ग्रामोद्योगाच्या ११७ उद्दिष्टांपैकी २६ प्रस्ताव मंजूर केले आहेत. चालू वर्षी (२०१९-२०) जिल्हा उद्योग केंद्राचे २०२, तर खादी ग्रामोद्योगचे १३२ उद्दिष्ट होते. जिल्हा उद्योग केंद्राकडून ७४३ आणि खादी ग्रामोद्योगकडून २१० प्रस्ताव पाठविले होते.

परंतु बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे ९३, तर खादी ग्रामोद्योगचे २३ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

लाभार्थीना आत्मनिर्भर बनविण्यासाठी योजना सुरू केली आहे, परंतु, प्रस्ताव रद्द करताना बँकेकडे पुरेसा पैसा नाही, प्रस्तावात जेवढी कागदपत्रे पाहिजे आहेत ते नाहीत, बँकेत पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, पैसे फेडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का? असे एक ना अनेक कारणे देऊन बँका शासनाने सुरू केलेल्या चांगल्या योजनेत खोडा घालत आहेत.

जिल्हा उद्योग व्यवस्थापकांचे मत युवक-युवतींना रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली आहे. आम्ही गतवर्षी ३४९ प्रस्ताव पाठविले. परंतु बँकेने ९३ प्रस्तावच मंजूर केले आहेत. प्रस्ताव पाठविल्यानंतर ते मंजूर करायला पाहिजे. परंतु, बँकांकडून म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा विषय मांडला होता. जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना वेळेत प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

-एस. ए. कादरी व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र