शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हानी टाळण्यासाठी रागावर नियंत्रण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:50 IST

पहेलवानकी करताना असो वा वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण आवश्यकच आहे. रागामुळे पहेलवानकीत केवळ डावच चुकेल. वैयक्तिक आयुष्यात रागामुळे मोठी हानीही होवू शकते. त्यामुळे शांतचित्त ठेवणे हेच सर्वात चांगले असते, असे मत हनुमान व्यायामशाळेचे पहेलवान पांडुरंग लुंगे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहेलवानकी करताना असो वा वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण आवश्यकच आहे. रागामुळे पहेलवानकीत केवळ डावच चुकेल. वैयक्तिक आयुष्यात रागामुळे मोठी हानीही होवू शकते. त्यामुळे शांतचित्त ठेवणे हेच सर्वात चांगले असते, असे मत हनुमान व्यायामशाळेचे पहेलवान पांडुरंग लुंगे यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, पहेलवान आहे म्हणजे अंगात रग आलीच. मात्र त्यासोबत राग असेल तर यश मिळणेच शक्य नाही. रागाच्या भरात इतरच वाद, तंटे घडून नुकसान होवू शकते. यापेक्षा जास्त संयम, रागावर नियंत्रण कुस्तीच्या आखाड्यात ठेवावे लागते. आपण रागाच्या भरात असल्यास आपली एक चूक पकडून समोरचा असा डाव टाकतो की, चित करतो. मीही एकदा अलिबाग येथे महाराष्ट्र केसरीसाठी खेळत होतो. पहिले चार राऊंड जिंकले होते. पाचव्या राऊंडला एका चांगल्या पहेलवानाशी गाठ पडली. तो मला काहीच हालचाल करू देत नव्हता आणि रागात आणत होता. पहिल्या सत्रापर्यंत त्याने माझ्याकडून १७ पॉर्इंट घेतले. हाफ टाईममध्ये मला चूक लक्षात आली. त्याने जसा मला राग आणला तसाच मीही डोके शांत ठेवून त्याला राग येईल, असे पाहिले. तो रागात आला अन् चुकला. त्यामुळे मी त्याला एकाच डावात चित करून हरणारी कुस्ती जिंकलो. त्यामुळे माणसाने राग ठेवला की, हार आलीच. ती कोणत्याही स्वरुपाची असो. माणसे तुटतात, आर्थिक नुकसानही होते. प्रेमाने हे सगळे मिळविणे मात्र सोपे आहे.आजची पिढी रागात लवकर येते. चिडचिड करते. ते चांगले नाही. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. अहंकार आणि रागावर मात करायला शिकले पाहिजे. लोकमतने गुड बोला, गोड बोला या उपक्रमातून ही शिकवण देण्याचे काम सुरू केले. या कामाला माझ्याकडून शुभेच्छा...

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक