शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोंढ्यात वाढली शेतीमालाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:47 IST

आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे.शनिवारी हिंगोली येथील मोंढ्यामध्ये सोयाबीन, तूर आणि हरभºयाची बीट असल्याने शेतकºयांनी शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला होता. सध्या विविध धार्मिक कार्यक्रमांसह लग्न समारंभातून सावरत शेतकरी शेतीच्या कामांकडे वळले आहेत. शेतीच्या कामाला गती आली असून, खरिपाच्या पेरणीसाठी घरात भाव वाढीच्या प्रतीक्षेत दडवून ठेवलेला शेतीमाल अखेर शेतकºयांना काढावा लागला.त्यातही नाफेडच्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांनीही खाजगी बाजारपेठेत शेतीमाल विक्रीस आणला होता. सध्या तुरीची या ठिकाणी ३०० ते ३५० पोते आवक झाली होती. तर तुरीला ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तो हमी भावापेक्षा हजार रुपयांहून अधिक कमी आहे. मात्र याच भावात शेतकºयांनी माल व्यापाºयांना दिला. तसेच सोयाबीनचीही आवक मोठ्या प्रमाणात होती.सोयाबीनला ३ हजार ५०० पासून पुढे भाव मिळाला. जवळपास २०० ते २५० पोत्याची आवक झाली होती. सध्या नाफेड केंद्रावर हरभºयाची खरेदी सुरु असली तरीही शेतकºयांना पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवित खाजगी बाजारपेठेत घेऊन येत आहेत. तर मोंढ्यामध्ये हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार १०० ते ३२०० रुपये भाव मिळाला होता. त्यातच अनेक शेतकरी खता-बियाणाचीही चौकशी करत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतकरी यावर्षी खरिपाची पेरणी करताना विचारपूर्वक करणार आहेत. मागील दोन वर्षांपासून मात्र हळदीला भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे इतर पारंपरिक पिकांनाबगल देत शेतकरी हळद लागवडीकडे सर्वाधिक जास्त वळले आहेत. काही शेतकरी तर दोन ते तीन क्विंटल हळदीची लागवड करुन पुढील वर्षीचा अंदाज घेत आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हळद लागवडीसाठी बेण्याचाही शोध घेत आहेत.सध्या हिंगोली येथील कृउबामध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, हळद पाहून ८ ते ९ हजारापर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजार