शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : शासनाने अंगणवाडीसेविकांना विविध प्रकारचे अहवाल लेखी तयार करून पाठविण्याच्या कामातून सुटका करण्यासाठी विशेष साॅफ्टवेअर विकसित करून सुविधा ...

हिंगोली : शासनाने अंगणवाडीसेविकांना विविध प्रकारचे अहवाल लेखी तयार करून पाठविण्याच्या कामातून सुटका करण्यासाठी विशेष साॅफ्टवेअर विकसित करून सुविधा निर्माण करून दिली. मात्र, हे मोबाईलच हँग होत असल्याने ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रणालींत काम करण्याची वेळ आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व १०८९ अंगणवाड्यांत मोबाईल दिले आहेत. सेविकांना त्यावरून विविध अहवाल पाठवावे लागतात. यासाठी या सेविकांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर काहीकाळ ही सेवा सुरळीत चालली. मात्र, आता हे मोबाईल हँग होत आहेत. अनेकांना तांत्रिक अडचण आली की कधी तालुक्याला तर कधी जिल्ह्याला मोबाईल पाठवावा लागतो. त्यानंतर ऑफलाईन केलेले काम पुन्हा ऑनलाईन करण्याची वेळ येत आहे. काही जणींना तर प्रशिक्षणात सांगितलेली माहिती नंतर लक्षात न राहिल्याने इतरांचा आधार घेवून मोबाईल हाताळावा लागतो. तशी हाताळणी करूनही मोबाईल हँग झाला तर अडचणींत भर पडत आहे. काहींचे मोबाईलच व्यवस्थित नसले तरीही एक वर्षाच्या वाॅरंटीत वारंवार दुरुस्ती करून काम भागविण्याचा प्रकार घडत असल्याचेही सांगितले जाते.

लिंकच चालत नसल्याने अडचण

कोरोनाच्या काळात लिंकच चालत नसल्याने अनेक अंगणवाडीसेविकांनी मोबाईलवर अपलोड केलेला डाटा ऑनलाईन झाला नाही. त्यामुळे पुन्हा ऑफलाईन करावा लागत आहे. ही अडचण अजून सुटली नाही.

मोबाईल तत्काळ दुरुस्त करून दिला जातो

ज्या अंगणवाडीसेविकांचा मोबाईल नादुरुस्त झाला त्यांना वाॅरंटीत लागलीच दुरुस्त करून मिळतो. फुटला अथवा इतर नुकसान झाले तर स्वत: भरून द्यावे लागते. चोरी झाली तर शासन भरून देते.

- गणेश वाघ,

महिला व बालकल्याण अधिकारी

मोबाईलवरुन कोणती सरकारी कामे करावी लागतात?

अंगणवाडीसेविकांना आपल्या अंगणवाडीतील प्रत्येक बालकाचे वजन व उंची मोजून ती ॲपवर भरावी लागते.

अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराविषयीची माहितीही विद्यार्थीनिहाय भरून द्यावी लागते.

गावातील सर्व गरोदर मातांच्या नोंदी घेवून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी दिलेल्या गृहभेटींच्या नोंदी कराव्या लागतात.

स्तनदामाता व बाळाच्या आरोग्याची माहिती घेवून त्यात काही अडचणी असल्यास त्याच्या नोंदीही द्याव्या लागतात.

बाळाचे दर महिन्याचे लसीकरण केले अथवा नाही, याची माहिती घेवून त्याची माहितीही भरावी लागते.

गावातील कुटुंबांचे आधार अपडेट झाले की नाही व ते लिंक करून घेतली की नाही याची माहितीही भरावी लागते.