शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अन् राजकीय शांतता पसरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:28 AM

जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.लोकसभा निवडणुकीला सहा महिने राहिले. ही निवडणूक लढणाऱ्यांनी मैदानात उतरणे साहजिक आहे. मात्र विधानस इच्छुकांनीच त्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मोठी गोची निर्माण झाली होती. लोकसभेचे घोडे बाजूलाच अन् ही मंडळीच उतावीळपणा करून चर्चेत येत होती. त्यात आताच निवडणुका नसल्याने धसमुसळेपणा वाढीस गेल्याने वातावरणही तंगले होते. एक-दोन मतदारसंघातील ठरावीक मंडळीच या रणांगणात आधीच उतरल्याचे दिसत होते. मात्र आता लोकसभा असो वा विधानसभा. कोणत्याही निवडणुकीसाठीचा पुढारी घराबाहेरही पडत नसल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरीही या पक्षाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मरगळ झटकली नाही. खा.राजीव सातव आले की, अ‍ॅक्टिव्ह होणारा हा पक्ष त्यांच्या दिल्ली दौºयात निपचित पडून राहतो. या पक्षात अनेकांना विधानसभेचे वेध लागल्याने ही मंडळी तेवढी चर्चेत येण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र जनमाणसात जावून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न स्पर्धेपुरताच उरल्याचे दिसत आहे. भाजप तर सत्ताधारी असल्याने त्यांनी नेतेमंडळी जमा करून ठेवली. मध्यंतरी सीएम चषकाच्या निमित्ताने या मंडळींनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यातही काही जणांचाच पुढाकार होता. जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांची भ्रमंती तेवढाच पक्षाचा कार्यक्रम असतो. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी कमालीची कामाला लागल्याचा साक्षात्कार हिंगोली जिल्ह्यालाही होत आहे. दर आठ दिवसाला कुणीतरी वरिष्ठ नेता येतो. स्थानिकांना कामाला लावतो. शिवसेनेत तर लोकसभा उमेदवाराचा शोधच संपणार नसल्याचे दिसत असून त्यांना ही जागा लढायची की नाही? असा संभ्रम निर्माण होण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.मध्यंतरी कळमनुरीचे काँग्रेस आ.संतोष टारफे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यात रंगलेल्या कलगीतुºयामुळे चर्चेत असलेली सेना आता पुन्हा थंड पडल्यात जमा आहे. एकंदर जिल्ह्यातील प्रमुख पक्षांसारखीच इतरांचीही स्थिती आहे. इतरही कोणी मैदानात उतरणार असल्याचे संकेत देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण