शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

..तर अतिक्रमित जागेवरही घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:31 IST

शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची दिलेल्या निकषानुसार नमुना क्र.८ ला नोंद असल्यास अशांना आता नियमाकुल केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या हजारो घरकुलांचा मार्ग मोकळा होणार असून हिंगोली जिल्ह्यातही अशा शेकडो घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे.ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाºया अनेक बेघरांना घरकुल योजनेत लाभ मिळाला. मात्र आता जागा नसल्याने पेच निर्माण झाला आहे. गाव नमुना क्र.८ ला नोंद असूनही या जागेची मालकी शासकीय असल्याने त्यांना घरकुल बांधकामास परवानगी मिळत नव्हती. खास घरकुल योजनेसाठी काढलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मालमत्ताधारकाच्या नावापुढे सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्यास ग्रामसेवकाने तसे प्रमाणित करायचे आहे. विस्तार अधिकाºयांनी त्याची काटेकोर तपासणी करून पंचायत समितीत सादर करायचे आहे. हे संगणकप्रणालीवर अपलोड करायचे आहे. त्यात केंद्रचालकाने डाटा एन्ट्री करताना कुणालाही वगळले नाही, याची ग्रामसेवकाने खात्री करून आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. ही यादी ग्रा.पं.त प्रसिद्ध करायची आहे. ही यादी ग्रामसभेतही प्रसिद्ध करायची आहे. यावर आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत देऊन ग्रामसभेनेही त्यास मान्यता दिल्यास आॅनलाईन प्रमाणित करायचे आहे. तर आक्षेप आल्यास त्यावर करावयाची प्रक्रियाही या शासन निर्णयात दिली आहे.यापूर्वी शासनाने दीनदयाल उपाध्याय योजनेत घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ठराविक रक्कम देण्याची योजना काढली होती. मात्र त्यात तुटपुंजी रक्कम मिळत होती. तर जागेचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे ती अपयशी ठरली. शासकीय जागेवर अतिक्रमणाची जागा चालत नव्हती. तर नवीन जागा मिळत नव्हती.अनेक घरकुले अपूर्ण : शेकडो रद्दही !२0१२-१३ पासून जागेसह इतर समस्येमुळे काही घरे रखडली तर काही रद्दच केली. २0१२-१३ ची अपूर्ण ४0 तर ९ रद्द, १३-१४ ला १५ अपूर्ण तर ८ रद्द २0१४ -१५ मध्ये ५0३ अपूर्ण तर १0६ रद्द करण्यात आली आहेत. तर २0१५-१६ मध्ये सर्वाधिक ७0६ अपूर्ण तर ४१ रद्द करण्यात आली होती.२0१६-१७ पासून चार हप्त्यांत घरकुलाचे आॅनलाईन काम सुरू झाले. यात प्रधानमंत्री आवासची २0१६-१७ मध्ये ३४३८ पैकी २६४१, रमाईची ९९२ पैकी ६७८, शब्री योजनेत २२६ पैकी १६४, पारधी योजनेत १३ पैकी ८ कामेच पूर्ण झाली आहेत.गरीब असूनही यादीत न आलेल्यांना प्रपत्र ड मध्ये नोंदवून घेण्यास आता ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपही काढण्यात आले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHingoliहिंगोली