शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कृषीउत्पन्न बाजार समितीने शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे - सुभाष देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:20 IST

शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले

हिंगोली : शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. ते ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थांनी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, महिला अध्यक्षा उज्वला तांभाळे, आ. माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी. आ. कुंडलिक नागरे, आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर,  अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी शेतकरी व महिलांनी कार्यकारी संस्थात कार्य करण्याचे आवाहन केले. यातून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. ग्रामिण भागातील संस्थाचा प्रस्ताव राज्यसरकार विचारत घेईल. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारच्या  मदतीतून कर्ज उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दुर करावी. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेत्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्याचे सांगितले. 

उसाच्या प्रश्नात लक्ष देणार सध्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हिंगोली जिल्हामध्यवर्त्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तो देखील मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या सोबतच आ. मुटकुळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली. मान्यवरांनी जिल्ह्यातील कृषीच्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीHingoliहिंगोली