शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

कृषीउत्पन्न बाजार समितीने शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे - सुभाष देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:20 IST

शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले

हिंगोली : शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. ते ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थांनी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, महिला अध्यक्षा उज्वला तांभाळे, आ. माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी. आ. कुंडलिक नागरे, आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर,  अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी शेतकरी व महिलांनी कार्यकारी संस्थात कार्य करण्याचे आवाहन केले. यातून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. ग्रामिण भागातील संस्थाचा प्रस्ताव राज्यसरकार विचारत घेईल. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारच्या  मदतीतून कर्ज उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दुर करावी. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेत्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्याचे सांगितले. 

उसाच्या प्रश्नात लक्ष देणार सध्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हिंगोली जिल्हामध्यवर्त्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तो देखील मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या सोबतच आ. मुटकुळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली. मान्यवरांनी जिल्ह्यातील कृषीच्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीHingoliहिंगोली