शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

कृषीउत्पन्न बाजार समितीने शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे - सुभाष देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:20 IST

शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले

हिंगोली : शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. ते ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थांनी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, महिला अध्यक्षा उज्वला तांभाळे, आ. माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी. आ. कुंडलिक नागरे, आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर,  अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी शेतकरी व महिलांनी कार्यकारी संस्थात कार्य करण्याचे आवाहन केले. यातून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. ग्रामिण भागातील संस्थाचा प्रस्ताव राज्यसरकार विचारत घेईल. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारच्या  मदतीतून कर्ज उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दुर करावी. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेत्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्याचे सांगितले. 

उसाच्या प्रश्नात लक्ष देणार सध्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हिंगोली जिल्हामध्यवर्त्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तो देखील मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या सोबतच आ. मुटकुळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली. मान्यवरांनी जिल्ह्यातील कृषीच्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीHingoliहिंगोली