शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

घरचे साधे पाणी परवडले ; पण कोरोना काळात जार नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

हिंगोली: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील जारच्या पाण्याची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. घरचे साधे पाणी परवडले; ...

हिंगोली: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील जारच्या पाण्याची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोना काळात जार नको, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला आहे. तेव्हापासून जारच्या पाण्याकडे नागरिकांचा ओढा तसा कमीच दिसून येत आहे. कोरोनाआधी जारच्या पाण्याला चांगली मागणी होती. आजमितीस शहरात २० तर जिल्ह्यात अंदाजे १२०० पाण्याचे प्लांट (जार) आहेत. २०१९ मध्ये जारमालकांना हिंगोली नगरपालिकेने पाणी शुद्धीकरण करूनच नागरिकांना द्यावे,अशी सूचनाही केली होती. कारवाई मात्र कोणावरही केली नाही, असेही सांगण्यात आले. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून अनेक नागरिक घरचे साधे पाणी पिलेले बरे, असे म्हणत जारकडे कानाडोळा करीत आहेत. मार्च २०१९ मध्ये दररोज जारची विक्री ३ हजार होती, मार्च २०२० मध्ये दररोज १ हजार विक्री व्हायची, मार्च २०२१ मध्ये अंदाजे दररोज ६०० जारची विक्री होत होती. हा आकडा शहरातील असून जिल्ह्यातील आकडा समजू शकला नाही. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून अनेक नागरिक जार बंद करू लागले आहेत. त्यामुळे जार व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. बेरोजगारीमुळे शहरातील सुशिक्षितांनी जारचा व्यावसाय सुरू केला. परंतु, कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खरे पाहिले तर जारचे पाणी आम्ही शुद्धीकरण करूनच देत असतो, असे जार व्यावसायिकांनी सांगितले.

जिल्ह्यात जवळपास १२०० प्लांट

जिल्ह्यात पाच तालुके असून नाही म्हटले तरी अंदाजे १२०० प्लांट तरी आजमितीस अस्तित्वात आहेत. यावर तालुका प्रशासन व नगरपालिकेचे नियंत्रण असते. कोरोनामुळे जिल्ह्यातील जार व्यवसायवर परिणाम झाला आहे. हिंगोली शहरात आजमितीस २० प्लांट सध्या कार्यरत आहेत.

पालिकेकडे २० प्रकल्पांची नोंद

हिंगोली शहरात जवळपास २० प्लांट असून त्याची नोंद नगरपालिकेकडे असल्याचे सांगण्यात आले. पाणी शुद्धीकरण करून देण्याच्या संदर्भात जार व्यावसायिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे नगरपालिकेने सांगितले. महिन्यातून एकवेळेस प्लांटची पाहणी केली जाते, असेही नगरपालिकेने सांगितले.

प्रतिक्रिया.............

कोरोना आधी चांगली विक्री व्हायची. परंतु, सध्या कोरोनाने ग्राहक कमी झाले आहेत. खरे पाहिले तर आम्ही पाणी शुद्धीकरण करून देत असतो. कोरोना आजाराचा नागरिकांनी धसका घेतला आहे. एकंदर व्यवसायावर परिणाम झाला आहे.

-मनीष जैन, जार विक्रेता

कोरोनाआधी जारचे पाणी चालू होते. परंतु, सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जारचे पाणी घेणे बंद आहे. कोरोना संपल्यानंतर परत सुरू करणार आहोत.

-भाऊसाहेब पाईकराव, नागरिक

कोरोना आधीपासून आम्ही घरचे साधे पाणीच पित आहोत. जारचे पाणी शुद्ध असले तरी आम्हाला घरचे साधे पाणीच जास्त आवडते. कधी-कधी पाणी उकळूनही पित असतो.

-आनंद शर्मा, नागरिक