शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

घरचे साधे पाणी परवडले ; पण कोरोना काळात जार नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

हिंगोली: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील जारच्या पाण्याची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. घरचे साधे पाणी परवडले; ...

हिंगोली: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील जारच्या पाण्याची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोना काळात जार नको, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला आहे. तेव्हापासून जारच्या पाण्याकडे नागरिकांचा ओढा तसा कमीच दिसून येत आहे. कोरोनाआधी जारच्या पाण्याला चांगली मागणी होती. आजमितीस शहरात २० तर जिल्ह्यात अंदाजे १२०० पाण्याचे प्लांट (जार) आहेत. २०१९ मध्ये जारमालकांना हिंगोली नगरपालिकेने पाणी शुद्धीकरण करूनच नागरिकांना द्यावे,अशी सूचनाही केली होती. कारवाई मात्र कोणावरही केली नाही, असेही सांगण्यात आले. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून अनेक नागरिक घरचे साधे पाणी पिलेले बरे, असे म्हणत जारकडे कानाडोळा करीत आहेत. मार्च २०१९ मध्ये दररोज जारची विक्री ३ हजार होती, मार्च २०२० मध्ये दररोज १ हजार विक्री व्हायची, मार्च २०२१ मध्ये अंदाजे दररोज ६०० जारची विक्री होत होती. हा आकडा शहरातील असून जिल्ह्यातील आकडा समजू शकला नाही. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून अनेक नागरिक जार बंद करू लागले आहेत. त्यामुळे जार व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. बेरोजगारीमुळे शहरातील सुशिक्षितांनी जारचा व्यावसाय सुरू केला. परंतु, कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खरे पाहिले तर जारचे पाणी आम्ही शुद्धीकरण करूनच देत असतो, असे जार व्यावसायिकांनी सांगितले.

जिल्ह्यात जवळपास १२०० प्लांट

जिल्ह्यात पाच तालुके असून नाही म्हटले तरी अंदाजे १२०० प्लांट तरी आजमितीस अस्तित्वात आहेत. यावर तालुका प्रशासन व नगरपालिकेचे नियंत्रण असते. कोरोनामुळे जिल्ह्यातील जार व्यवसायवर परिणाम झाला आहे. हिंगोली शहरात आजमितीस २० प्लांट सध्या कार्यरत आहेत.

पालिकेकडे २० प्रकल्पांची नोंद

हिंगोली शहरात जवळपास २० प्लांट असून त्याची नोंद नगरपालिकेकडे असल्याचे सांगण्यात आले. पाणी शुद्धीकरण करून देण्याच्या संदर्भात जार व्यावसायिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे नगरपालिकेने सांगितले. महिन्यातून एकवेळेस प्लांटची पाहणी केली जाते, असेही नगरपालिकेने सांगितले.

प्रतिक्रिया.............

कोरोना आधी चांगली विक्री व्हायची. परंतु, सध्या कोरोनाने ग्राहक कमी झाले आहेत. खरे पाहिले तर आम्ही पाणी शुद्धीकरण करून देत असतो. कोरोना आजाराचा नागरिकांनी धसका घेतला आहे. एकंदर व्यवसायावर परिणाम झाला आहे.

-मनीष जैन, जार विक्रेता

कोरोनाआधी जारचे पाणी चालू होते. परंतु, सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जारचे पाणी घेणे बंद आहे. कोरोना संपल्यानंतर परत सुरू करणार आहोत.

-भाऊसाहेब पाईकराव, नागरिक

कोरोना आधीपासून आम्ही घरचे साधे पाणीच पित आहोत. जारचे पाणी शुद्ध असले तरी आम्हाला घरचे साधे पाणीच जास्त आवडते. कधी-कधी पाणी उकळूनही पित असतो.

-आनंद शर्मा, नागरिक