शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी साईनगरवासियांचा राष्ट्रीय महामार्गावर २ तास रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:11 IST

साईनगर वस्तीतला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा किंवा कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. 

ठळक मुद्देही वसाहत ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेत समाविष्ठ नाही त्यामुळे ही वसाहत मुलभूत सुविधेपासून वंचित आहे.विविध मागणीचे निवेदन साईनगरवासियांनी तहसीलदारांना ३० आॅक्टोबर रोजी दिले होते.

कळमनुरी ( हिंगोली)  : साईनगर वस्तीतला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा किंवा कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.ऋषी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला व महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

मागील १८ ते २० वर्षांपासून साईनगर ही वस्ती आहे. येथे १५०० च्या जवळपास लोकसंख्या आहे. ही वसाहत ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेत समाविष्ठ नाही त्यामुळे ही वसाहत मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. येथे अंतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पथदिवे नाहीत, पक्के रस्त्े नसल्याने पावसाळ्यात अडचणी येतात. नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पथदिवे नसल्याने रात्री वसाहतीत अंधार असतो. या वसाहतीतील नागरिकांना कोणतेही शासकीय कागदपत्रे मिळत नाहीत. या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अथवा दुस-या ग्रामपंचायतीत ही वसाहत समाविष्ठ करावा, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रास्तारोको करण्यात आला. 

हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या आक्रमक आंदोलनानंतर तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.ऋषी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून गावठाण आकारबंध केल्यानंतर अभिलेख वेगळे करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तसेच  येत्या सात दिवसांत यावर निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागणीचे निवेदन साईनगरवासियांनी तहसीलदारांना ३० आॅक्टोबर रोजी दिले होते. निवेदनावर रामराव मुकाडे, भगवान कांबळे, यु.जी. गुजरे, के.पी.इंगळे, डी.डी. वाकडे, ज्योती राठोड, मनोहर गव्हाणे, मनेष बुजूर्गे, सूर्यवंशी, विठ्ठल खरोडे आदींच्या स्वाक्ष-या होत्या.