शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पीकविम्यावरून संतापाचा सूर; गोरेगाव-जिंतूर मार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर

By रमेश वाबळे | Updated: January 21, 2023 14:08 IST

शेतकऱ्यांचे चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण

- दिलीप कावरखे गोरेगाव (जि.हिंगोली) : पीकविमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून गोरेगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

 यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. पीकविमाच्या मागणीसाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पंधरा दिवसात पीकविमापोटी संरक्षीत रक्कमेसह १३.८९ कोटी परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची अद्यसापही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाचा सूर उमटत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून  १३ जानेवारी रोजी सेनगाव येथील पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तर यांच्या ताफ्याला सेनगाव- रिसोड मार्गावर काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी गोरेगाव- जिंतूर मार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, वसमत तालुकाध्यक्ष बापुराव गरड, युवा तालुकाध्यक्ष ऋषिकेश बर्वे यांच्याकडून केल्या जात असलेल्या उपोषणाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पाठिंबा मिळत आहे.

रविवारी बंदची हाक...आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी (दि.२१ जानेवारी) गोरेगावसह हिंगोली व सेनगाव येथील बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाHingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती