शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: June 9, 2023 16:03 IST

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून केला वाहन टोळीचा पर्दाफाश

हिंगोली : कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्रात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला व पाच जिल्ह्यातील पोलिसांना हवा असलेला चोरटा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर पथकाने आंतरराज्य वाहन टोळीचाच पर्दापाश केला. चारजण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दहा लाखांचे दोन वाहने जप्त केली. 

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता भागातून ३ जून रोजी ट्रक चोरीला गेला होता. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ट्रक चोरट्याच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. यातील ट्रक चोरटा सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने खुर्शीद अहमद बशीर अहमद (वय ५० वर्षे,रा. चंद्रानगुट्टा पलकनुमा पॅलेस हैदराबाद) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने ट्रक चोरल्याची कबुली दिली. तसेच हा ट्रक त्याचा मित्र आरेफ अहमद शेख (रा. आळंद ता. फुलंब्री) यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरेफ शेख यास ताब्यात घेतले असता त्याने हा ट्रक त्याचा मित्र रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफीक (रा.रेंगटीपुरा छत्रपती संभाजीनगर), अझर अकबर शेख (गारखेड परिसर छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्फत शे.शाहेद शे.वाहेद (रा. धाराशीव) याला विकल्याचे सांगितले. पथकाने ट्रक जप्त केला. तसेच यातील तिघांनी महागाव (जि. यवतमाळ) पोलिस ठाणे हद्दीतील गुंज येथून १ कार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

जळगाव कारागृहातून सुटला अन् पुन्हा चोरीयातील खुर्शीद अहमद बशीर अहमद हा वाहन चोरीचा आंतरराज्य गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहातून सुटल्याची माहिती आहे. तसेच त्याच्यावर कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्र या तिन्ही राज्यात एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पोलिस त्याचा शोध घेत होती. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दापाश केला. 

दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवासहिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून दरोडा,चोरी,जबरी चोरी,वाहन चोरी सारख्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पकडले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी व्हावळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रमोद थोरात यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली