शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 20:46 IST

गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर एका शेतकरी तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे करीत अतिवृष्टीचे अनुदान सरसकट देण्याची मागणी केली आहे.

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांच्या नासाडीमुळे उत्पन्न घटीची शक्यता बघता पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. परंतु शासनाकडून सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीसाठी एकूण ३२ कोटी २३ लाख ४७ हजार २०० रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात असताना गोरेगावसह बाभूळगाव आजेगाव व पुसेगाव हे चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होऊनही अतिवृष्टीतून वगळल्या गेल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ताकतोडा येथील नामदेव पतंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न केला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीतून काही मंडळांना डावलण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आधीच नापिकी, त्यातच कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावीत खासगी फायनान्स कंपन्यांनी नाकीनऊ आणले असून, अशावेळी आम्ही जगायचे कसे ते सांगा? आम्ही रक्ताचा अभिषेक करून आमचा जीव सोडून देऊ, असेही पत्रात नमूद करण्यात आले. तसेच पीक नुकसानीबाबत अतिवृष्टी अनुदान सरसकट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पत्र...रक्ताने लिहिलेले पत्र सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविले आहे. हेच पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे. रक्ताने लिहिलेले पत्र नायब तहसीलदार सुनील कावरखे यांना सुपुर्द केल्याची माहिती नामदेव पतंगे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोली