आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲण्टीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात ९ बाधित आढळले. यात खडकपुरा १, बियाणीनगर १, हिंगोली ३, जवळा बाजार १, सरस्वतीनंगर १, रिसाला बाजार १, इसापूर १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात २० बाधित आढळले. यात बाळापूर ४, कान्हेगाव १, जुनुना वस्ती २, कवडी ३, चिखली १, कोंढूर ३, येहळेगाव २, वाशिम १, कांडली २, कळमनुरी १ यांचा समावेश आहे. वसमत तालुक्यात ६६ पैकी १२ बाधित आढळले. यात गिरगाव ६, वसमत ५, नांदेड १ यांचा समावेश आहे. औंढ्यात ४२ पैकी जवळा बाजार व निशाणा येथील प्रत्येकी १ बाधित आढळला. सेनगाव तालुक्यात ४६ पैकी ४ बाधित आढळले. यात सेनगाव २ व वरखेडा २ असे रुग्ण आहेत.
आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात १६ बाधित आढळले. यात पहेणी १, सामान्य रुग्णालय १, आंबेडकरनगर २, सरस्वतीनगर १, रिसाला बाजार २, आझम कॉलनी २, संत नामदेवनगर १, अंतुलेनगर १, जिजामातानगर २, श्रीनगर २, एटीसी १, जि.प. क्वार्टर १, सेनगाव तालुक्यात १५ बाधित आढळले असून यात भानखेडा, गोरेगाव १४ यांचा समावेश आहे. वसमत तालुक्यात ४ बाधित आढळले असून यात दाभाडी १, नहाद १, बुधवार पेठ १, पाटीलनगर १, औंढा परिसरात ४ रुग्ण आढळले असून यात जवळा बाजार ३ व साळणा येथील एकाचा समावेश आहे. कळमनुरीत ५ रुग्ण आढळले. तर, आज ११४ कोविड-१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात हिंगोली ३८, लिंबाळा २९, कळमनुरी ३२, वसमत १५ असे कोरोना केअर सेंटरनिहाय रुग्ण सोडले.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ५ हजार ३८९ रुग्ण झाले असून, त्यापैकी ४ हजार ८४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आजघडीला जिल्ह्यात एकूण ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ७४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये भरती असलेल्या कोविड-१९ रुग्णांपैकी ४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर, ६ कोविड-१९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण ४६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.