शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:42 IST

शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रुपए याप्रमाणे वषार्काठी १ हजार रुपए मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमाच झाले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हा नेहमीचाच विषय आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर व जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी शिक्षण विभागाकडे हा प्रश्न वारंवार मांडला. त्यानंतर विभागीय आयुक्त शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, शिक्षण संचालक (पुणे) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले. शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागाकडे तर याबाबत कधीच माहिती उपलब्ध नसते. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याकडेच माहितीचे रेकॉर्ड असते, असे सांगत हात झटकतात. मानधन खात्यावर जमा केले जात नसल्यामुळे विविध शाळांतील मुख्याध्यापक सोमवारी बँकेला जाब विचारणार आहेत.पाच महिन्यांपासून बँकेत धनादेश पडून...भारतीय स्टेट बँकेत मुख्यध्यापकांच्या २०१७-१८ मधील मानधनासाठी धनादेश ३१ मार्च २०१८ रोजीच बँकेत जमा करण्यात आला आहे.पंरतु बँकेने अद्याप मुख्याध्यापकांच्या खात्यावर शासनाकडून मिळालेली मानधनाची रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धनादेश देऊनही खात्यावर रक्कम वर्ग होत नसल्याचे कारण हा शोधाचा विषय आहे. मागील दोन वर्षांपासून मानधन मिळत नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे. याबाबत विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांकडे धाव घेत अनेकदा मानधनाची मागणीही केली होती.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक