शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:42 IST

शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रुपए याप्रमाणे वषार्काठी १ हजार रुपए मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमाच झाले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हा नेहमीचाच विषय आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर व जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी शिक्षण विभागाकडे हा प्रश्न वारंवार मांडला. त्यानंतर विभागीय आयुक्त शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, शिक्षण संचालक (पुणे) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले. शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागाकडे तर याबाबत कधीच माहिती उपलब्ध नसते. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याकडेच माहितीचे रेकॉर्ड असते, असे सांगत हात झटकतात. मानधन खात्यावर जमा केले जात नसल्यामुळे विविध शाळांतील मुख्याध्यापक सोमवारी बँकेला जाब विचारणार आहेत.पाच महिन्यांपासून बँकेत धनादेश पडून...भारतीय स्टेट बँकेत मुख्यध्यापकांच्या २०१७-१८ मधील मानधनासाठी धनादेश ३१ मार्च २०१८ रोजीच बँकेत जमा करण्यात आला आहे.पंरतु बँकेने अद्याप मुख्याध्यापकांच्या खात्यावर शासनाकडून मिळालेली मानधनाची रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धनादेश देऊनही खात्यावर रक्कम वर्ग होत नसल्याचे कारण हा शोधाचा विषय आहे. मागील दोन वर्षांपासून मानधन मिळत नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे. याबाबत विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांकडे धाव घेत अनेकदा मानधनाची मागणीही केली होती.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक