शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

८०५० कुटुंब ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:38 IST

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे लाच पुर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली. देशामध्ये सर्वप्रथम महावितरणने दिलेल्या उदिष्टांची पुर्तता केली आहे. नांदेड जिल्हयातील पिंपरी महिपाल,लोणी खु.,पांगरी, माकणी,मंजूळगा, मानसाखरगा, पांडुरणी, चाकूर, केरूर, रहाटी खु., शिवूर, लहयारी, डोरली, दिग्रस, रावणगाव तामसा, कर्णा, परातपूर, येसगी, अंबाडी, राऊतखेडा तसेच हिंगोली जिल्हयातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश होता.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदिष्ट पुर्ततेसाठी परिश्रम घेत राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीज जोडणी दिली. दुर्गम व संवेदनशील गडचिरोली जिल्हयातील ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपुर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण