शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

८०५० कुटुंब ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:38 IST

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे लाच पुर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली. देशामध्ये सर्वप्रथम महावितरणने दिलेल्या उदिष्टांची पुर्तता केली आहे. नांदेड जिल्हयातील पिंपरी महिपाल,लोणी खु.,पांगरी, माकणी,मंजूळगा, मानसाखरगा, पांडुरणी, चाकूर, केरूर, रहाटी खु., शिवूर, लहयारी, डोरली, दिग्रस, रावणगाव तामसा, कर्णा, परातपूर, येसगी, अंबाडी, राऊतखेडा तसेच हिंगोली जिल्हयातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश होता.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदिष्ट पुर्ततेसाठी परिश्रम घेत राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीज जोडणी दिली. दुर्गम व संवेदनशील गडचिरोली जिल्हयातील ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपुर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण