शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

८०५० कुटुंब ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:38 IST

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे लाच पुर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली. देशामध्ये सर्वप्रथम महावितरणने दिलेल्या उदिष्टांची पुर्तता केली आहे. नांदेड जिल्हयातील पिंपरी महिपाल,लोणी खु.,पांगरी, माकणी,मंजूळगा, मानसाखरगा, पांडुरणी, चाकूर, केरूर, रहाटी खु., शिवूर, लहयारी, डोरली, दिग्रस, रावणगाव तामसा, कर्णा, परातपूर, येसगी, अंबाडी, राऊतखेडा तसेच हिंगोली जिल्हयातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश होता.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदिष्ट पुर्ततेसाठी परिश्रम घेत राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीज जोडणी दिली. दुर्गम व संवेदनशील गडचिरोली जिल्हयातील ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपुर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण