शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:15 IST

कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.

विजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करूनही अनेकांना मागील दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळाला नसल्याची बोंब आहे. तर काहींनी जुने अर्जच वाया गेल्याने नव्याने अर्ज केलेले आहेत. ३0 जून २0१८ पर्यंत या योजनेत ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६0 कोेटींची कर्जमाफी झाल्याचे सांतिले जात होते. तर त्यावेळी ६0 हजार ९२२ शेतकºयांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये जमा झाले होते. तर २ हजार १४५ शेतकºयांचे १६ कोटी २२ लाख रुपये खात्यावर जमा होणे बाकी होते.यानंतर मध्येच शासनाने कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याला दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पूर्वी ज्यांनी अर्ज केले नाही, अशांना नव्याने आस लागली होती. १0 आॅगस्ट २0१८ चा हा निर्णय होता. मात्र त्याचे अर्ज कधी व कसे करायचे, याची काहीच माहिती नव्हती. नंतर यात माहिती संकलित करण्यासाठीही सूचना न आल्याने बराच काळ हा आदेश बस्त्यात होता. मात्र शेतकºयांना अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ६६ हजारांवरून लाभार्थीसंख्या ७३ हजारांवर गेली. तर कर्जमाफीचा लाभ २६२ कोटींवरून ३२७ कोटींवर गेला आहे. मात्र प्रत्यक्षात ७७00 शेतकºयांच्या खात्यावर रक्कमच जमा होणे बाकी आहे. अजूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतकºयांना बँक खात्यावर रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळायची काहीच सोय नाही. मुंबईतून हा कारभार चालतो. त्यामुळे स्थानिक अधिकारी हैराण आहेत. बºयाच जणांनी तर या कर्जमाफीची आशा सोडली आहे. तर दुसरीकडे ७३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले जात असल्याने नेमके घोडे कुठे पेंड खातेय? हे कळायला मार्ग नाही. अशा यंत्रणेची गरज आहे.पूर्वीच्या ६६ हजार लाभार्थ्यांहून आता ७३ हजारांवर लाभार्थीसंख्या गेली. यामये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २४ हजार २३३ जणांना ३0.0८ कोटींची कर्जमाफी झाली. २0 हजार ८५२ जणांना २५ कोटींचा लाभ मिळाला. ३३८१ जण शिल्लक आहेत. राष्ट्रीयकृत बँकांत ३९१११ जणांना २४0 कोटींची कर्जमाफी झाली. ३७६३९ जणांच्या खात्यावर २0३ कोटी गेले. १४७२ जणांचे ३७ कोटी शिल्लक आहेत. तर ग्रामीण बँकेत १0३३२ जणांना ५७.२२ कोटींची कर्जमाफी झाली. ७४८५ जणांच्या खात्यावर ३९.३९ कोटी गेली. २८४७ जण शिल्लक आहेत.कर्जमाफीतील ७७00 जणांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही विविध कारणांनी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ५९.९९ कोटींचा लाभ मिळणार आहे. रक्कम खात्यावर कधी येणार? हा प्रश्न आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी