शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:15 IST

कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.

विजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करूनही अनेकांना मागील दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळाला नसल्याची बोंब आहे. तर काहींनी जुने अर्जच वाया गेल्याने नव्याने अर्ज केलेले आहेत. ३0 जून २0१८ पर्यंत या योजनेत ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६0 कोेटींची कर्जमाफी झाल्याचे सांतिले जात होते. तर त्यावेळी ६0 हजार ९२२ शेतकºयांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये जमा झाले होते. तर २ हजार १४५ शेतकºयांचे १६ कोटी २२ लाख रुपये खात्यावर जमा होणे बाकी होते.यानंतर मध्येच शासनाने कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याला दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पूर्वी ज्यांनी अर्ज केले नाही, अशांना नव्याने आस लागली होती. १0 आॅगस्ट २0१८ चा हा निर्णय होता. मात्र त्याचे अर्ज कधी व कसे करायचे, याची काहीच माहिती नव्हती. नंतर यात माहिती संकलित करण्यासाठीही सूचना न आल्याने बराच काळ हा आदेश बस्त्यात होता. मात्र शेतकºयांना अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ६६ हजारांवरून लाभार्थीसंख्या ७३ हजारांवर गेली. तर कर्जमाफीचा लाभ २६२ कोटींवरून ३२७ कोटींवर गेला आहे. मात्र प्रत्यक्षात ७७00 शेतकºयांच्या खात्यावर रक्कमच जमा होणे बाकी आहे. अजूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतकºयांना बँक खात्यावर रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळायची काहीच सोय नाही. मुंबईतून हा कारभार चालतो. त्यामुळे स्थानिक अधिकारी हैराण आहेत. बºयाच जणांनी तर या कर्जमाफीची आशा सोडली आहे. तर दुसरीकडे ७३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले जात असल्याने नेमके घोडे कुठे पेंड खातेय? हे कळायला मार्ग नाही. अशा यंत्रणेची गरज आहे.पूर्वीच्या ६६ हजार लाभार्थ्यांहून आता ७३ हजारांवर लाभार्थीसंख्या गेली. यामये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २४ हजार २३३ जणांना ३0.0८ कोटींची कर्जमाफी झाली. २0 हजार ८५२ जणांना २५ कोटींचा लाभ मिळाला. ३३८१ जण शिल्लक आहेत. राष्ट्रीयकृत बँकांत ३९१११ जणांना २४0 कोटींची कर्जमाफी झाली. ३७६३९ जणांच्या खात्यावर २0३ कोटी गेले. १४७२ जणांचे ३७ कोटी शिल्लक आहेत. तर ग्रामीण बँकेत १0३३२ जणांना ५७.२२ कोटींची कर्जमाफी झाली. ७४८५ जणांच्या खात्यावर ३९.३९ कोटी गेली. २८४७ जण शिल्लक आहेत.कर्जमाफीतील ७७00 जणांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही विविध कारणांनी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ५९.९९ कोटींचा लाभ मिळणार आहे. रक्कम खात्यावर कधी येणार? हा प्रश्न आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी