शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:15 IST

कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.

विजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करूनही अनेकांना मागील दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळाला नसल्याची बोंब आहे. तर काहींनी जुने अर्जच वाया गेल्याने नव्याने अर्ज केलेले आहेत. ३0 जून २0१८ पर्यंत या योजनेत ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६0 कोेटींची कर्जमाफी झाल्याचे सांतिले जात होते. तर त्यावेळी ६0 हजार ९२२ शेतकºयांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये जमा झाले होते. तर २ हजार १४५ शेतकºयांचे १६ कोटी २२ लाख रुपये खात्यावर जमा होणे बाकी होते.यानंतर मध्येच शासनाने कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याला दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पूर्वी ज्यांनी अर्ज केले नाही, अशांना नव्याने आस लागली होती. १0 आॅगस्ट २0१८ चा हा निर्णय होता. मात्र त्याचे अर्ज कधी व कसे करायचे, याची काहीच माहिती नव्हती. नंतर यात माहिती संकलित करण्यासाठीही सूचना न आल्याने बराच काळ हा आदेश बस्त्यात होता. मात्र शेतकºयांना अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ६६ हजारांवरून लाभार्थीसंख्या ७३ हजारांवर गेली. तर कर्जमाफीचा लाभ २६२ कोटींवरून ३२७ कोटींवर गेला आहे. मात्र प्रत्यक्षात ७७00 शेतकºयांच्या खात्यावर रक्कमच जमा होणे बाकी आहे. अजूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतकºयांना बँक खात्यावर रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळायची काहीच सोय नाही. मुंबईतून हा कारभार चालतो. त्यामुळे स्थानिक अधिकारी हैराण आहेत. बºयाच जणांनी तर या कर्जमाफीची आशा सोडली आहे. तर दुसरीकडे ७३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले जात असल्याने नेमके घोडे कुठे पेंड खातेय? हे कळायला मार्ग नाही. अशा यंत्रणेची गरज आहे.पूर्वीच्या ६६ हजार लाभार्थ्यांहून आता ७३ हजारांवर लाभार्थीसंख्या गेली. यामये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २४ हजार २३३ जणांना ३0.0८ कोटींची कर्जमाफी झाली. २0 हजार ८५२ जणांना २५ कोटींचा लाभ मिळाला. ३३८१ जण शिल्लक आहेत. राष्ट्रीयकृत बँकांत ३९१११ जणांना २४0 कोटींची कर्जमाफी झाली. ३७६३९ जणांच्या खात्यावर २0३ कोटी गेले. १४७२ जणांचे ३७ कोटी शिल्लक आहेत. तर ग्रामीण बँकेत १0३३२ जणांना ५७.२२ कोटींची कर्जमाफी झाली. ७४८५ जणांच्या खात्यावर ३९.३९ कोटी गेली. २८४७ जण शिल्लक आहेत.कर्जमाफीतील ७७00 जणांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही विविध कारणांनी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ५९.९९ कोटींचा लाभ मिळणार आहे. रक्कम खात्यावर कधी येणार? हा प्रश्न आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी