शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा खरेदी ५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:23 IST

राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तूर खरेदीमध्ये आतून सुरु असलेल्या राजकारणामुळे शेतकºयांचे मात्र दिवाळेच निघत आहे. लागेबांधे असलेल्यांचीच तूर खरेदी होत आहे, यातही काही शंका नाही. काही ठरावीक शेतकºयांचीच कितीही तूर खरेदी करण्याचा प्रकारही घडत आहे. यापूर्वी झालेल्या घोटाळ्यानंतर कोणताच बोध घेतला नाही. यंदा जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकºयांनी खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नंतर कुठे तरी नाफेडमार्फत खरेदी सुरु केली. तीन महिन्यांत नाफेडने ६ हजार २०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली. यामध्ये हिंगोलीच्या केंद्रावर ७४९ शेतकºयांची १०७६५.५० क्विंटल, सेनगावात १६३२ शेतकºयांची २२७७४ क्विंटल, कळमनुरीच्या खरेदी केंद्रावर १३२९ शेतकºयांची १४२११ क्विंटल, वसमत येथील खरेदी केंद्रावर ९७० शेतकºयांची ७७७७. ५० क्विंटल तर जवळा बाजार येथे १५२१ शेतकºयांची १४७७०. ५० क्विंटल अशी एकूण ६२०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर अजून या ठिकाणी नोंदणी केलेल्या ७ हजार ५२५ शेतकºयांची तूर खरेदी बाकीच आहे. कधी- खरेदी खरेदी केंद्रावर खरेदी कमी आणि गोंधळच जास्त होत असल्याचे चित्र असल्याने खरेदी मंद गतीने केली जाते.जिल्ह्यात हिंगोली येथील केंद्र वगळता इतर ठिकाणी बºयापैकी हरभरा खरेदी सुरु आहे. हिंगोली मात्र जागेअभावी एक कधी दोन शेतकºयांची खरेदी केली जाते. जिल्ह्यात हरभरा विक्री करण्यासाठी जवळपास ४ हजार४४२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केवळ २६७ शेतकºयांचा हरभरा खरेदीकेला आहे. यामध्ये हिंगोली १६६४. ५० क्विं. सेनगाव ३१०. ५०, कळमनुरी ००, वसमत २५४ क्विं. आणि जवळा बाजार येथे १ हजार ७२१. ५० क्विंटल असे एकून २७६ शेतकºयांची खरेदी केली. २९ मेची हरभरा खरेदीची डेटलाईन दिली आहे.एका शेतकºयाची लपून तूर खरेदी तर केली. मात्र हिशेबात गोंधळ होत आहे. यावरून बाजार समितीच्या शेतकरी भवनात खुर्च्यांची फेकाफेकीही झाल्याची चर्चा जोरात ऐकायला मिळत आहे.आजपासून तूर खरेदी बंदबुधवारपासून हमीभाव केंद्रावर तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे ७५२५ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कदाचित यापैकी काही शेतकºयांना पैशांची निकड असल्याने त्यांनी खाजगी बाजारपेठेत तूर विकली असेलही मात्र त्यातूनही राहिलेल्या शेतकºयांनी प्रतीक्षा करूनही शासन तूर खरेदी करीत नसल्यास करायचे तरी काय? असा प्रश्न आहे. हिंगोलीतील ३५५८ पैकी ७४९, सेनगावचे २७९0 पैकी १६३२, कळमनुरीचे २६५६ पैकी १३२९, वसमतचे १७५३ पैकी ९७0 तर जवळा बाजारचे २९६९ पैकी १५२१ जणांचीच तूर खरेदी झाली.हरभºयालाही २९ मेचीच मुदतहमीभाव केंद्रावर हरभरा खरेदीसाठी २९ मेची मुदत आहे. तर अवघ्या २६७ शेतकºयांची तूर खरेदी झाली. कळमनुरीत तर हरभरा खरेदीचे खातेच उघडलेले नाही. या बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणात सभापती, संचालक व सचिवही लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने गोत्यात आले होते. तर हरभरा खरेदी ही बाजार समिती करू शकली नाही. नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादकांची संख्या हिंगोली १३९४, सेनगाव-२३७, कळमनुरी-२२३, वसमत-९३७ व जवळा बाजार १६५१ अशी आहे. तर पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने हा प्रश्न चिघळू शकतो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती