शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा खरेदी ५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:23 IST

राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तूर खरेदीमध्ये आतून सुरु असलेल्या राजकारणामुळे शेतकºयांचे मात्र दिवाळेच निघत आहे. लागेबांधे असलेल्यांचीच तूर खरेदी होत आहे, यातही काही शंका नाही. काही ठरावीक शेतकºयांचीच कितीही तूर खरेदी करण्याचा प्रकारही घडत आहे. यापूर्वी झालेल्या घोटाळ्यानंतर कोणताच बोध घेतला नाही. यंदा जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकºयांनी खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नंतर कुठे तरी नाफेडमार्फत खरेदी सुरु केली. तीन महिन्यांत नाफेडने ६ हजार २०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली. यामध्ये हिंगोलीच्या केंद्रावर ७४९ शेतकºयांची १०७६५.५० क्विंटल, सेनगावात १६३२ शेतकºयांची २२७७४ क्विंटल, कळमनुरीच्या खरेदी केंद्रावर १३२९ शेतकºयांची १४२११ क्विंटल, वसमत येथील खरेदी केंद्रावर ९७० शेतकºयांची ७७७७. ५० क्विंटल तर जवळा बाजार येथे १५२१ शेतकºयांची १४७७०. ५० क्विंटल अशी एकूण ६२०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर अजून या ठिकाणी नोंदणी केलेल्या ७ हजार ५२५ शेतकºयांची तूर खरेदी बाकीच आहे. कधी- खरेदी खरेदी केंद्रावर खरेदी कमी आणि गोंधळच जास्त होत असल्याचे चित्र असल्याने खरेदी मंद गतीने केली जाते.जिल्ह्यात हिंगोली येथील केंद्र वगळता इतर ठिकाणी बºयापैकी हरभरा खरेदी सुरु आहे. हिंगोली मात्र जागेअभावी एक कधी दोन शेतकºयांची खरेदी केली जाते. जिल्ह्यात हरभरा विक्री करण्यासाठी जवळपास ४ हजार४४२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केवळ २६७ शेतकºयांचा हरभरा खरेदीकेला आहे. यामध्ये हिंगोली १६६४. ५० क्विं. सेनगाव ३१०. ५०, कळमनुरी ००, वसमत २५४ क्विं. आणि जवळा बाजार येथे १ हजार ७२१. ५० क्विंटल असे एकून २७६ शेतकºयांची खरेदी केली. २९ मेची हरभरा खरेदीची डेटलाईन दिली आहे.एका शेतकºयाची लपून तूर खरेदी तर केली. मात्र हिशेबात गोंधळ होत आहे. यावरून बाजार समितीच्या शेतकरी भवनात खुर्च्यांची फेकाफेकीही झाल्याची चर्चा जोरात ऐकायला मिळत आहे.आजपासून तूर खरेदी बंदबुधवारपासून हमीभाव केंद्रावर तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे ७५२५ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कदाचित यापैकी काही शेतकºयांना पैशांची निकड असल्याने त्यांनी खाजगी बाजारपेठेत तूर विकली असेलही मात्र त्यातूनही राहिलेल्या शेतकºयांनी प्रतीक्षा करूनही शासन तूर खरेदी करीत नसल्यास करायचे तरी काय? असा प्रश्न आहे. हिंगोलीतील ३५५८ पैकी ७४९, सेनगावचे २७९0 पैकी १६३२, कळमनुरीचे २६५६ पैकी १३२९, वसमतचे १७५३ पैकी ९७0 तर जवळा बाजारचे २९६९ पैकी १५२१ जणांचीच तूर खरेदी झाली.हरभºयालाही २९ मेचीच मुदतहमीभाव केंद्रावर हरभरा खरेदीसाठी २९ मेची मुदत आहे. तर अवघ्या २६७ शेतकºयांची तूर खरेदी झाली. कळमनुरीत तर हरभरा खरेदीचे खातेच उघडलेले नाही. या बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणात सभापती, संचालक व सचिवही लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने गोत्यात आले होते. तर हरभरा खरेदी ही बाजार समिती करू शकली नाही. नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादकांची संख्या हिंगोली १३९४, सेनगाव-२३७, कळमनुरी-२२३, वसमत-९३७ व जवळा बाजार १६५१ अशी आहे. तर पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने हा प्रश्न चिघळू शकतो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती