शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आमदार निधीत ५ कोटी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:55 IST

जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ५१५ कोटी रुपये निधी खर्चास वाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ५१५ कोटी रुपये निधी खर्चास वाव आहे.हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांचे यावर्षीचे २ कोटी तर समर्पित रकमेपैकी १.३७ कोटी प्राप्त झाले. त्यांना यापूर्वीच्या कामांसाठी २ कोटी राखीव ठेवावे लागणार आहेत. दीडपट कामांच्या हिशेबाने १.९३ कोटींचा खर्च करता येणे शक्य असताना १.७५ कोटींच्या त्यांनी सुचविलेल्या कामांची प्रशासकीय मान्यताही झाली. आता १८ लाखांचा वाव आहे. त्यांनी एकूण ४२ कामे सुचविली आहेत. कळमनुरीचे आ.संतोष टारफे यांना यंदाचे २ तर समर्पित निधीचे १.७२ कोटी मिळाले. अपूर्ण कामांवर १.९६ कोटींचा खर्च होणार असून दीडपटीत २.६३ कोटी खर्च करता येणार आहेत. त्यांनी सुचविलेल्या १.३९ कोटींच्या ३६ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. १.२४ कोटींचे नियोजन करणे शक्य आहे. वसमतचे आ.जयप्रकाश मुंदडा यांना यंदाचे २ कोटी व समर्पित प्राप्त निधी १ कोटी आहे. जुन्या अपूर्ण कामांसाठी १.३२ कोटी लागतील. दीडपटीत त्यांना २.५४ कोटींचा निधी खर्च करण्यास वाव आहे. त्यांनी १.९५ कोटींची ३३ कामे सुचविल्याने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता ५८ लाखांच्या कामांना त्यांना वाव आहे.विधान परिषदेचे दोन आमदार जिल्ह्यात काम करतात. आ.विप्लव बाजोरिया यांना दीड कोटींचा निधी मिळाला असून त्यांनी ३८.८0 लाखांची १८ कामे सुचविली आहेत. तर आ.रामराव वडकुते यांना यंदाचे २ कोटी व समर्पित निधीपैकी १0३ लक्ष मिळाले. अपूर्ण कामांवर दीड कोटींचा खर्च होणार आहे. तर १0२ लक्ष किंमतीची ५७ कामे त्यांनी प्रशासकीय मान्यतेस पाठविली. त्यांना १.२७ कोटींची कामे सुचविण्यास वाव आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जणांनी निधी खर्च करण्यासाठी घाई चालविली आहे. तर काही जण हा निधी योग्यवेळी वापरण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. निवडणुकांमुळे अनेक गावांतून आमदार-खासदारांकडे निधीची मागणी करण्यास शिष्टमंडळे धाव घेताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वीच गावातील काम मार्गी लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. मात्र त्याच त्या कामांची मागणी करण्यात येत असल्याने त्यातही अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे अशी कामे केवळ प्रस्तावातच राहतात.खासदारांना दरवर्षी ५ कोटींचा निधी मिळतो. यापैकी ३.९१ कोटींची कामे खा.राजीव सातव यांनी या आर्थिक वर्षात सुचविली आहेत. त्यामुळे अवघ्या १ कोटींच्या खर्चास वाव आहे. त्यांनी यंदा ९२ कामे सुचविली. यापैकी ५ पूर्ण तर २६ प्रगतीत आहेत. उर्वरित सुरूच झाली नाहीत.

टॅग्स :MLAआमदारfundsनिधी