शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात ४४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना आजाराच्या चाचण्यांचे ८५० एवढे उद्दिष्ट असताना त्या तुलनेत अर्ध्याही चाचण्या ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना आजाराच्या चाचण्यांचे ८५० एवढे उद्दिष्ट असताना त्या तुलनेत अर्ध्याही चाचण्या होत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात एकूण ४४ टक्के मृत्यू मधुमेहमुळे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजारामुळे वयोगट १ ते २० यामध्ये २, वयोगट २१ ते ४० यामध्ये ३, वयोगट ४१ ते ६० यामध्ये २२, वयोगट ६१ ते ८० यामध्ये २३ तर वयोगट ८१ ते १०० यामध्ये ३ अशा एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरुषांची संख्या ३८ असून महिलांची संख्या १५ आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २५ डिसेंबर रोजी कोरोना आजाराच्या रोज एक हजार चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. यात खासगी व शासकीय ओपीडीमध्ये येणाऱ्या व कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर अथवा अँटीजेन चाचणी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे. तसे जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना आजाराचे प्रमाण अजून तरी कमी झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना किंवा बाहेरगावी जाताना मास्कचा वापर करावा. तसेच सॅनिटायझरचा वापरही जास्तीत जास्त करावा. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.

- डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

सध्या तरी इतर आजार नाही

कोरोना आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्यातरी इतर आजाराचे रूग्ण जिल्ह्यात आढळले नाही, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले.

नियमित उपचार करुन घ्यावा

मधुमेह रुग्णांनी नियमितपणे आपली तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. अस्वस्थपणा वाटल्यास लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणी केल्यानंतर दिलेले औषधी वेळेवर व नियमितपणे घेतल्यास मधुमेह बरा होतो.