शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

४२८४ लाभार्थींना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:26 IST

हिंगोली : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गंत २०२६-१७ ते २०२०-२१ या वर्षात जिल्ह्याला ६ हजार ७६६ ...

हिंगोली : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गंत २०२६-१७ ते २०२०-२१ या वर्षात जिल्ह्याला ६ हजार ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ४ हजार २८२ लाभार्थींनी घरकुलाचे काम पूर्ण केले असून, त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत २०२६-१७ ते २०२०-२१ या वर्षात ६ हजार ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजनेला बळकटी दिली जात आहे. त्याअंतर्गंत या योजनेतील लाभार्थींना अनुदानही मंजूर केले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींना ६०६० घरकुले मंजूर झाली. यातील ५ हजार ३६९ लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला. तसेच ४ हजार ५९४ जणांना दुसरा, ४ हजार २२७ जणांना तिसरा, तर २ हजार ४०० जणांना चौथा हप्ता देण्यात आला आहे. यातील ४ हजार २८४ घरकुले पूर्ण झाली असून, या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

२४८२ लाभार्थींना घरकुल पूर्ण होण्याची प्रतीक्षा

जिल्ह्यातील २ हजार ४८२ लाभार्थींच्या घरकुलाची कामे अपूर्ण आहेत. यातील काहीजणांना पहिला, तर काहीजणांना घरकुल बांधकामाचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे. मात्र बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने अनेक लाभार्थींनी घराचे बांधकाम थांबविले होते.

जिल्ह्यातील पूर्ण झालेली घरकुले

तालुका उद्दिष्ट पूर्ण झालेली घरकुले

औंढा नागनाथ ८५६ ५३९

वसमत १२९२ ८८१

हिंगोली १५११ ८८७

कळमनुरी १७०१ १११४

सेनगाव १४०६ ८६३

एकूण ६७६६ ४२८४