शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

४१ टक्के बालकेच कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:40 IST

जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.हिंगोली जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापनेसाठी निधी दिला होता. जवळपास ५0 लाखांपेक्षा जास्त निधी यावर खर्च झाला. यात तीव्र कुपोषित असलेली एकूण ४४४ बालके दाखल केली होती. कळमनुरी-२३, वसमत-१३४, हिंगोली-६१, सेनगाव-९१, औंढा ना.-१0९ तर आखाडा बाळापूर-२६ अशी प्रकल्पनिहाय बालकांची संख्या होती. यापैकी १८३ बालके तीव्रमधून कमी कुपोषित गटात आली होती. तर २१८ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यश आले होते. यामध्ये कळमनुरी-६, वसमत-८१, हिंगोली-३६, सेनगाव-४६, औंढा नागनाथ-४४, आखाडा बाळापूर-५ अशी बालकांची संख्या आहे. यात सर्वाधिक ६0 टक्के बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात वसमत प्रकल्पाला यश आले होते. तर बाळापूरचे सर्वांत कमी २0 टक्केच काम होते. कळमनुरीतील १ तर हिंगोलीची तीन बालके हे केंद्रच सोडून गेले. एनआरसीमध्ये ५ बालकांना दाखल केले होते. तर ३४ बालकांची कमी कुपोषणाच्या श्रेणीतून सुधारणा झाली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.आॅक्टोबर महिन्यात पुन्हा तपासणी केली असता जिल्ह्यात पुन्हा कमी व तीव्र कमी वजन गटातील बालकांच्या संख्यात वाढ झालीआहे. त्यामुळे एकीकडे कुपोषणावर मात केली की, दुसरीकडे पुन्हा तेवढीच नवीन मुले या गर्तेत ढकलली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ९७ हजार २८४ बालकांचा सर्व्हे केला. यातील ७८ हजार ९७६ बालकांचे वजन घेतले. यापैकी ७0 हजार ११५ बालके सर्वसाधारण आढळली. यामध्ये कळमनुरी ५५७८, वसमत-१६0५४, हिंगोली-१२५५८, सेनगाव-१३७२७, औंढा ना.-१३१४८, आखाडा बाळापूर-९0५0 अशी संख्या आहे. तर ७४३२ बालके कमी वजन गटातील आहेत. यात कळमनुरी-५९१, वसमत-१४0५, हिंगोली-१५१३, सेनगाव-१४६६, औंढा-१५७९ तर आखाडा बाळापूर-८७८ अशी संख्या आहे.तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या मात्र वाढली आहे. यात कळमनुरी १२८, वसमत-२१३, हिंगोली-३४७, सेनगावगफ़६८, औंढा ना.-२९२, आखाडा बाळापूर-१८१ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. हे प्रमाण १.८१ टक्के आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealth Tipsहेल्थ टिप्स