शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
4
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
5
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
6
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
7
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
9
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
10
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
11
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
12
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
13
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
14
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
15
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
16
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
20
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

४१ टक्के बालकेच कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:40 IST

जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.हिंगोली जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापनेसाठी निधी दिला होता. जवळपास ५0 लाखांपेक्षा जास्त निधी यावर खर्च झाला. यात तीव्र कुपोषित असलेली एकूण ४४४ बालके दाखल केली होती. कळमनुरी-२३, वसमत-१३४, हिंगोली-६१, सेनगाव-९१, औंढा ना.-१0९ तर आखाडा बाळापूर-२६ अशी प्रकल्पनिहाय बालकांची संख्या होती. यापैकी १८३ बालके तीव्रमधून कमी कुपोषित गटात आली होती. तर २१८ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यश आले होते. यामध्ये कळमनुरी-६, वसमत-८१, हिंगोली-३६, सेनगाव-४६, औंढा नागनाथ-४४, आखाडा बाळापूर-५ अशी बालकांची संख्या आहे. यात सर्वाधिक ६0 टक्के बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात वसमत प्रकल्पाला यश आले होते. तर बाळापूरचे सर्वांत कमी २0 टक्केच काम होते. कळमनुरीतील १ तर हिंगोलीची तीन बालके हे केंद्रच सोडून गेले. एनआरसीमध्ये ५ बालकांना दाखल केले होते. तर ३४ बालकांची कमी कुपोषणाच्या श्रेणीतून सुधारणा झाली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.आॅक्टोबर महिन्यात पुन्हा तपासणी केली असता जिल्ह्यात पुन्हा कमी व तीव्र कमी वजन गटातील बालकांच्या संख्यात वाढ झालीआहे. त्यामुळे एकीकडे कुपोषणावर मात केली की, दुसरीकडे पुन्हा तेवढीच नवीन मुले या गर्तेत ढकलली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ९७ हजार २८४ बालकांचा सर्व्हे केला. यातील ७८ हजार ९७६ बालकांचे वजन घेतले. यापैकी ७0 हजार ११५ बालके सर्वसाधारण आढळली. यामध्ये कळमनुरी ५५७८, वसमत-१६0५४, हिंगोली-१२५५८, सेनगाव-१३७२७, औंढा ना.-१३१४८, आखाडा बाळापूर-९0५0 अशी संख्या आहे. तर ७४३२ बालके कमी वजन गटातील आहेत. यात कळमनुरी-५९१, वसमत-१४0५, हिंगोली-१५१३, सेनगाव-१४६६, औंढा-१५७९ तर आखाडा बाळापूर-८७८ अशी संख्या आहे.तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या मात्र वाढली आहे. यात कळमनुरी १२८, वसमत-२१३, हिंगोली-३४७, सेनगावगफ़६८, औंढा ना.-२९२, आखाडा बाळापूर-१८१ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. हे प्रमाण १.८१ टक्के आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealth Tipsहेल्थ टिप्स