शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:51 IST

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.शासनाने कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यात कोणतीही अडचण नसलेल्या ३३ हजार ९९३ शेतकºयांसाठी ११९.२८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७७२ खातेदारांना २४.४७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ११ हजार ४५ जणांना ६२.२४ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६१७६ खातेदारांसाठी ३२.५५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. मात्र यापैकी ३३ हजार ६0८ शेतकºयांच्या खात्यावर १0३.९८ कोटी प्रत्यक्ष जमा झाले आहेत.याशिवाय माहिती जुळत नसल्याने प्रलंबित असलेले ३३0३५ अर्ज आहेत. तर काहींचे अर्जच दुहेरी, तिहेरी असल्याने एकूण ३३ हजार ४६२ अर्ज तालुका समितीकडे निर्णयास्तव पाठविले होते. त्यात दुरुस्ती झाल्यानंतर समितीने २९ हजार ६८४ अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोडींगला पाठविले आहेत. यात हिंगोली-७९६७, वसमत-६९९६, औंढा ना.-२६९६, कळमनुरी-६५३२ तर सेनगाव- ५४९१ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे. या अर्जांची राज्य समितीकडे तपासणी झाल्यानंतर निकषात किती बसतील, याचा काही नेम नाही. या अर्जांमधून निकषात बसलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट आल्यास संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य आहे. तर हिंगोली-४४९, वसमत-९७0, औंढा ८१७, कळमनुरी-६६१ व सेनगाव ८८१ असे ३७७८ अर्ज बँकांच्या उदासीनतेमुळे तालुका समित्यांकडेच पडून आहेत. हे अर्ज अपलोड करण्याची मुदत संपूनही यात काहीच झालेले नाही.उदासीनता : दीड लाखांवरील कर्जज्यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज होते अशांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे ३३८५ शेतकरी आहेत. यात जि.म.स.च्या ११७९ शेतकºयांना ९१ लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२0६ शेतकºयांना १४.३७ कोटींचा लाभ मिळू शकतो. मात्र उर्वरित रक्कम नभरल्याने कर्जमाफीचे १५.२९ कोटी रुपयेही तसेच पडून आहेत. ही उर्वरित रक्कम भरण्याकडे शेतकºयांचा फारसा कल नाही. त्यातच यंदा अल्पपर्जन्यामुळे खरीप तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबीला फटका बसला. त्यामुळे याला प्रतिसाद मिळणे शक्य नाही.कर्जमाफीसाठी १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६९९३ पात्र ठरले. यातून ३३६0८ जणांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली. तर त्रुटी दूर करून अजून २९६८४ अर्ज शासनाकडे गेले आहेत.