शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:51 IST

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.शासनाने कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यात कोणतीही अडचण नसलेल्या ३३ हजार ९९३ शेतकºयांसाठी ११९.२८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७७२ खातेदारांना २४.४७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ११ हजार ४५ जणांना ६२.२४ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६१७६ खातेदारांसाठी ३२.५५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. मात्र यापैकी ३३ हजार ६0८ शेतकºयांच्या खात्यावर १0३.९८ कोटी प्रत्यक्ष जमा झाले आहेत.याशिवाय माहिती जुळत नसल्याने प्रलंबित असलेले ३३0३५ अर्ज आहेत. तर काहींचे अर्जच दुहेरी, तिहेरी असल्याने एकूण ३३ हजार ४६२ अर्ज तालुका समितीकडे निर्णयास्तव पाठविले होते. त्यात दुरुस्ती झाल्यानंतर समितीने २९ हजार ६८४ अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोडींगला पाठविले आहेत. यात हिंगोली-७९६७, वसमत-६९९६, औंढा ना.-२६९६, कळमनुरी-६५३२ तर सेनगाव- ५४९१ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे. या अर्जांची राज्य समितीकडे तपासणी झाल्यानंतर निकषात किती बसतील, याचा काही नेम नाही. या अर्जांमधून निकषात बसलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट आल्यास संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य आहे. तर हिंगोली-४४९, वसमत-९७0, औंढा ८१७, कळमनुरी-६६१ व सेनगाव ८८१ असे ३७७८ अर्ज बँकांच्या उदासीनतेमुळे तालुका समित्यांकडेच पडून आहेत. हे अर्ज अपलोड करण्याची मुदत संपूनही यात काहीच झालेले नाही.उदासीनता : दीड लाखांवरील कर्जज्यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज होते अशांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे ३३८५ शेतकरी आहेत. यात जि.म.स.च्या ११७९ शेतकºयांना ९१ लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२0६ शेतकºयांना १४.३७ कोटींचा लाभ मिळू शकतो. मात्र उर्वरित रक्कम नभरल्याने कर्जमाफीचे १५.२९ कोटी रुपयेही तसेच पडून आहेत. ही उर्वरित रक्कम भरण्याकडे शेतकºयांचा फारसा कल नाही. त्यातच यंदा अल्पपर्जन्यामुळे खरीप तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबीला फटका बसला. त्यामुळे याला प्रतिसाद मिळणे शक्य नाही.कर्जमाफीसाठी १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६९९३ पात्र ठरले. यातून ३३६0८ जणांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली. तर त्रुटी दूर करून अजून २९६८४ अर्ज शासनाकडे गेले आहेत.