शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

हिंगोलीत ‘सौभाग्य’साठी ३२ हजार वीज मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.महावितरणने २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील अद्याप वीज नसलेल्या ४७ हजार २३१ कुटूंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज जोडणीचे लक्ष निधार्रीत केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या निर्देशानुसार ‘सौभाग्य’च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटूंबांना वीजेचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने सर्व वीज जोडणीकरीता जुलै २०१८ पासून मोहीमेस प्रारंभ केला आहे.जिल्ह्यातील ४७ हजार २३१ कुटूंबियांपैकी ४ हजार ३२५ कुटूंबियांकरीता नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यात रोहित्रासह विजेचे खांब, तारा कामांचा समावेश आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व यंत्रणा उभी करण्याचे आदेश संबंधीत एजन्सीधारकांना दिले आहेत. विजेपासून वंचीत असलेल्या २३ हजार ९०८ कुटूंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून पंधरा दिवसाच्या आत वीजजोडणी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.योजनेतंर्गत (दारिर्द्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) यांना अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांत भरण्याची सुविधाही असल्याचे सांगण्यात आले.पंधरा दिवसांत कामे : उद्दीष्ट पूर्ततेचे नियोजनसौभाग्य योजनेतून प्रत्येक गरीबाच्या घरात वीजजोडणी मिळणार आहे. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे सर्व सामान्य कुटूंबांचे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. योजनेची कामे जोरात सुरू असून कर्मचारी दररोज दोन हजार वीज जोडण्या पूर्ण करीत आहेत. उदिष्ट पुर्तता येत्या पंधरा दिवसांत पूर्ण केली जाईल, तसे नियोजन करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. वीजजोडणी करीता आवश्यक वीज मीटरही उपलब्ध आहेत. सध्या योजनेसाठी हिंगोली मंडळाकडे ३२ हजार मीटर उपलब्ध असून येत्या दोन दिवसांत आणखी १० हजार मीटर उपलब्ध होणार असल्याचेही जाधव म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीelectricityवीज