शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२८ लाखांची खंडणी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:02 IST

वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुरूंदा शिवारातील टोकाई कारखाना येथे कैलास राठोड, त्यांची पत्नी हे किराणा दुकान टाकून उदरनिर्वाह करतात. फिर्यादी हा पळसोना ता.हिंगोली येथील रहिवाशी आहे. फिर्यादीच्या पत्नीने १० वर्षापूर्वी २० बैलबंडी ऊस तोडीकरिता लावून देण्यासाठी ५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळेस ठरल्याप्रमाणे २० बैलबंडी लावून देण्यात आले. या घटनेतून तब्बल १० वर्षानंतर आरोपी दिलीप उघडे व इतर चार जणांनी संगनमत करून क्रूझर जीपमध्ये टोकाई कारखाना येथून फिर्यादीचा पती कैलास राठोड यास उचलून नेऊन त्याचे अपहरण केले. ही घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. फिर्यादीने त्यावेळेस अर्ज दिला होता. परंतु मोबाईलवरून फिर्यादीस तुझा पती पाहिजे असेल तर २८ लाख रुपये आणून दे, अन्यथा तुझ्या पतीला जिवे मारतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादीच्या पतीला डांबून खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे.फिर्यादी शीलाबाई कैलास राठोड (४२, रा.पळसोना ता.जि.हिंगोली ह.मु. टोकाई कारखाना) यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप हरिभाऊ उघडे (रा. बोडखा ता.धारूर जि.बीड) व इतर चार जण एकूण पाच जणाविरोधात कलम ३६१ अ, ५०६,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी.केंद्रे, पोना आडे हे करीत आहेत.अपहरण झालेल्या इसमाचा अद्याप शोध लागला नसून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी धारूरला पोलीस पथक जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र येथील परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.वसमत येथे तरूणाची आत्महत्यावसमत : येथील आंबेडकर नगर भागातील रहिवाशी २८ वर्षीय युवकाने राहत्या घरात शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी वसमत शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसमत शहरातील आंबेडकर नगर येथील सिद्धार्थ (पिंटू) जळबाजी दातार (२८) या तरूणाने ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर वेळ निश्चित नाही, साडीने घरातच गळफास घेतला. सदर तरूण घरात एकटाच राहत असे. दुपारी त्याचा जेवणाचा डबा घेवून आलेल्या भाच्यास हा प्रकार समजला. याप्रकरणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी