शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 18:53 IST

हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

ठळक मुद्देमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

हिंगोली : कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची सोमवारी पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन गावे २४ फेब्रुवारी निवडली जाणार होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यादी जाहिर करण्यात आली असून यामध्ये हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे. एकूण २३३ लाभार्थ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत १ लाख ५ हजार ६९० शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. अद्याप ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणीचे काम प्रलंबीत आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आधार जोडणीचे काम पुर्ण करावे असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड केली होती. मौजे समगा गावातील १४७ तर खरबी येथील ८६ असे एकूण २३३ लाभार्थ्यांची यादी सोमवारी संबंधीत गावात प्रसिध्द केली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. समगा व खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देवून सोमवारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव आदी उपस्थितत होते. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली भेटकर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी समगा याठिकाणी भेट देऊन प्रत्येक्ष पाहणी केली. यावेळी आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर समगा व खरबी याठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनीही भेटी देऊन पाहणी केली.४२३३ लाभार्थ्यांची बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात हिंगोली तालुक्यातील समगा गावातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अलाहाबाद बँक -१, बँक आॅफ इंडिया-२८, स्टेट बँक आॅफ इंडिया-२२, युनियन बँक आॅफ इंडिया-९६ असे एकूण १४७ लाभार्थी शेतकरी तर खरबी येथील बँक आॅफ बडोदा या बँकेमध्ये एकूण ८६ लाभार्थी शेतकरी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधीState Governmentराज्य सरकार