शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विहिरींवर १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:06 IST

जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत २६१७ सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. यामध्ये औंढ्यात ६५७, वसमत-२१३, हिंगोली-५९४, कळमनुरी- ४४१, सेनगाव-७१२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यात ४४ कोटी रुपयांचा मजुरीवर तर ३१ कोटी रुपयांचा बांधकाम साहित्यावर खर्च अपेक्षित आहे. यापैकी १४.४३ कोटी रुपये मजुरीवर आतापर्यंत खर्ची पडले आहेत. तर साहित्यावर केवळ ५१.३५ लाखांचा खर्च झाला आहे. यामध्ये २0१८-१९ या आर्थिक वर्षात औंढा ३.६३ कोटी, वसमत-७८ लाख, हिंगोली-४.५६ कोटी, कळमनुरी-२.६७ कोटी तर सेनगावात २.७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. साहित्यावर कमी खर्च दिसत असल्याने या विहिरी केवळ खोदकामातच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वसमत तालुका सर्वात पिछाडीवर आहे. थोडीबहुत हिंगोली व सेनगावात बांधकामाची बरी स्थिती दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामांवरून मोठी ओरड कायम होत असते. पुढाऱ्यांच्या सभा यावरच गाजतात. मात्र प्रत्यक्षात मजुरांअभावी कामेच पुढे रेटत नसल्याचे चित्र आहे. यावर काहीच उपाय नसला तरीही नुसती भरमसाठ कामे सुरू करूनही उपयोग नसल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात ती पूर्ण होणेही अगत्याचे आहे. आतापर्यंत केवळ ११६ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याचे पंचायत समित्यांच्या अहवालावरून दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना अंमलात येत असताना ही संख्या काही समाधानकारक मानता येणार नाही. याला गती देण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे.तीनच कामे पूर्ण : ९४१ झाली होती सुरूहिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत विविध प्रकारची ९४१ कामे २0१८-१९ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ तीन कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षातील उणीपुरी सात महिने हातची गेली. त्यातील चार महिने पावसाळ्याचे सोडले तरीही तीन महिन्यात तीनच कामे झाल्याचे दिसते.या योजनेत मंजूर असलेल्या कामांची औंढा १८८, वसमत २0५, हिंगोली २२३, कळमनुरी-८५, सेनगाव २३९ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर हिंगोलीतील तीन कामे तेवढी पूर्ण झाली आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण 0.३२ टक्के आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१५ पासून आजपर्यंत १६१0२ कामांना मग्रारोहयोत प्रारंभ केला होता. यापैकी ९२३४ कामे पूर्ण झाली असून ५८६८ अपूर्ण आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण ५७.३५ टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार