शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

विहिरींवर १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:06 IST

जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत २६१७ सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. यामध्ये औंढ्यात ६५७, वसमत-२१३, हिंगोली-५९४, कळमनुरी- ४४१, सेनगाव-७१२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यात ४४ कोटी रुपयांचा मजुरीवर तर ३१ कोटी रुपयांचा बांधकाम साहित्यावर खर्च अपेक्षित आहे. यापैकी १४.४३ कोटी रुपये मजुरीवर आतापर्यंत खर्ची पडले आहेत. तर साहित्यावर केवळ ५१.३५ लाखांचा खर्च झाला आहे. यामध्ये २0१८-१९ या आर्थिक वर्षात औंढा ३.६३ कोटी, वसमत-७८ लाख, हिंगोली-४.५६ कोटी, कळमनुरी-२.६७ कोटी तर सेनगावात २.७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. साहित्यावर कमी खर्च दिसत असल्याने या विहिरी केवळ खोदकामातच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वसमत तालुका सर्वात पिछाडीवर आहे. थोडीबहुत हिंगोली व सेनगावात बांधकामाची बरी स्थिती दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामांवरून मोठी ओरड कायम होत असते. पुढाऱ्यांच्या सभा यावरच गाजतात. मात्र प्रत्यक्षात मजुरांअभावी कामेच पुढे रेटत नसल्याचे चित्र आहे. यावर काहीच उपाय नसला तरीही नुसती भरमसाठ कामे सुरू करूनही उपयोग नसल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात ती पूर्ण होणेही अगत्याचे आहे. आतापर्यंत केवळ ११६ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याचे पंचायत समित्यांच्या अहवालावरून दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना अंमलात येत असताना ही संख्या काही समाधानकारक मानता येणार नाही. याला गती देण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे.तीनच कामे पूर्ण : ९४१ झाली होती सुरूहिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत विविध प्रकारची ९४१ कामे २0१८-१९ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ तीन कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षातील उणीपुरी सात महिने हातची गेली. त्यातील चार महिने पावसाळ्याचे सोडले तरीही तीन महिन्यात तीनच कामे झाल्याचे दिसते.या योजनेत मंजूर असलेल्या कामांची औंढा १८८, वसमत २0५, हिंगोली २२३, कळमनुरी-८५, सेनगाव २३९ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर हिंगोलीतील तीन कामे तेवढी पूर्ण झाली आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण 0.३२ टक्के आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१५ पासून आजपर्यंत १६१0२ कामांना मग्रारोहयोत प्रारंभ केला होता. यापैकी ९२३४ कामे पूर्ण झाली असून ५८६८ अपूर्ण आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण ५७.३५ टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार