शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींवर १५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:06 IST

जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत २६१७ सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. यामध्ये औंढ्यात ६५७, वसमत-२१३, हिंगोली-५९४, कळमनुरी- ४४१, सेनगाव-७१२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यात ४४ कोटी रुपयांचा मजुरीवर तर ३१ कोटी रुपयांचा बांधकाम साहित्यावर खर्च अपेक्षित आहे. यापैकी १४.४३ कोटी रुपये मजुरीवर आतापर्यंत खर्ची पडले आहेत. तर साहित्यावर केवळ ५१.३५ लाखांचा खर्च झाला आहे. यामध्ये २0१८-१९ या आर्थिक वर्षात औंढा ३.६३ कोटी, वसमत-७८ लाख, हिंगोली-४.५६ कोटी, कळमनुरी-२.६७ कोटी तर सेनगावात २.७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. साहित्यावर कमी खर्च दिसत असल्याने या विहिरी केवळ खोदकामातच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वसमत तालुका सर्वात पिछाडीवर आहे. थोडीबहुत हिंगोली व सेनगावात बांधकामाची बरी स्थिती दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामांवरून मोठी ओरड कायम होत असते. पुढाऱ्यांच्या सभा यावरच गाजतात. मात्र प्रत्यक्षात मजुरांअभावी कामेच पुढे रेटत नसल्याचे चित्र आहे. यावर काहीच उपाय नसला तरीही नुसती भरमसाठ कामे सुरू करूनही उपयोग नसल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात ती पूर्ण होणेही अगत्याचे आहे. आतापर्यंत केवळ ११६ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याचे पंचायत समित्यांच्या अहवालावरून दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना अंमलात येत असताना ही संख्या काही समाधानकारक मानता येणार नाही. याला गती देण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे.तीनच कामे पूर्ण : ९४१ झाली होती सुरूहिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत विविध प्रकारची ९४१ कामे २0१८-१९ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ तीन कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षातील उणीपुरी सात महिने हातची गेली. त्यातील चार महिने पावसाळ्याचे सोडले तरीही तीन महिन्यात तीनच कामे झाल्याचे दिसते.या योजनेत मंजूर असलेल्या कामांची औंढा १८८, वसमत २0५, हिंगोली २२३, कळमनुरी-८५, सेनगाव २३९ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर हिंगोलीतील तीन कामे तेवढी पूर्ण झाली आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण 0.३२ टक्के आहे.हिंगोली जिल्ह्यात २0१५ पासून आजपर्यंत १६१0२ कामांना मग्रारोहयोत प्रारंभ केला होता. यापैकी ९२३४ कामे पूर्ण झाली असून ५८६८ अपूर्ण आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण ५७.३५ टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार