शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

१४५२ शिक्षकांच्या बदल्या, ३७0 लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:52 IST

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून त्यांना आता पुन्हा २0 पर्याय भरून द्यावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून त्यांना आता पुन्हा २0 पर्याय भरून द्यावे लागणार आहेत.हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण राज्यात शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. अनेकदा आॅनलाईन अर्ज केल्यानंतर अखेर ही प्रक्रिया यंदा शाळा सुरू होण्यापूर्वी यशस्वी झाली आहे. यामध्ये १९२४ प्राथमिक शिक्षक बदलीपात्र होते. तर पदवीधर शिक्षक २४३, मुख्याध्यापक १७९ अशा एकूण २३४६ जणांनी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. यापैकी प्राथमिक शिक्षकांच्या १२१९, पदवीधर शिक्षकांच्या १४७ तर मुख्याध्यापकांच्या ८६ बदल्या झाल्या आहेत. एकूण १४५२ शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत. एकूणच्या तुलनेत ६१.८९ टक्के जणांचे आदेश शासनाने रात्री अपलोड केले.या शिक्षकांना शिक्षण विभागाने कार्यमुक्तही केले आहे.या बदल्यांमुळे आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक लटकले होते. आता त्यांना पुन्हा ३७0 शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.यामध्ये अनेक शिक्षकांनी शासन निर्णयाचा चांगलाच अभ्यास केला होता. अशांनी ठिकाणे निवडताना २0 मध्ये आपण असलेल्या परिसरातीलच मात्र आहे त्या तालुक्यातील, बाहेरच्या तालुक्यातील गावे निवडताना डोके वापरले. अशांना इतरत्र नव्हे, तर तालुक्यातच पुन्हा बदली मिळाली.विशेष म्हणजे २५ किमीच्या फेऱ्यातच अनेक शिक्षकांना शाळा मिळाल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांना हे जमले नाही, अशांचा तालुकाही बदलला गेला मात्र अपेक्षित ठिकाण तेवढे मिळाले. त्यांना यातही आनंद मिळतोय, हे तेवढेच खरे.बदली झालेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांना संबधित केंद्र अंतर्गत येणाºया शाळांवर रूजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिलीआनंदाचे वातावरणदरम्यान, शिक्षकांना या बदल्या कोणताही खर्च न करता केवळ आॅनलाईन अर्जावर झाल्याचा मोठा आनंद वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये बहुतांश शिक्षक कोणतीही खळखळ न करता आपल्याला चांगले ठिकाण मिळल्याचे सांगत आहेत. बोटावर मोजण्याइतकेच मात्र खुप दूरचा पर्याय मिळाल्यासारखे बोलत आहेत. परंतु इतरांमुळे ते काही नाराजी व्यक्त करीत नाहीत.विस्थापितांनी करावा फेरअर्जज्या शिक्षकांनी २0 गावांच्या शाळांचे पर्याय दिल्यानंतरही बदल्या झाल्या नाहीत, अशा ३७0 शिक्षकांना आता पुन्हा आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अशा शिक्षकांसाठी पुन्हा वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यांनाही बदल्यांना सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. या लटकलेल्यांमध्ये बहुतांश महिला शिक्षिका आहेत. अवघड क्षेत्रातून त्यांना वगळले असले तरीही अनेकांनी शहरानजीकच्याच शाळांची दिलेली यादी अन् अपुरी पडलेली ज्येष्ठता यामुळे त्यांना शाळा मिळाल्या नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये बोंब दिसत आहे. तरीही आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडल्यामुळे अशांना एक तेवढी संधी आहे. मात्र त्यातूनही हुकल्यास मग मिळेल त्या ठिकाणीच जाण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसत आहे. या रिक्त जागांवर आता अनेकजण नजर ठेवून असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकTransferबदली