शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणयाचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु पालकांच्या विनंतीनुसार परत १० जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख करण्यात आली. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत वारंवार बदल करण्यात आला. जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी परत संधी उपलब्ध करून देत १० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आॅनलाई अर्ज करताना पालकांनी पाल्यांची माहिती शासनाने दिलेल्या अटींचे पालन करून भरून घेण्याच्या तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅप करून भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले होते. आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश नाकारणाऱ्यांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी शिक्षण विभागाकडे काही पालकांनी प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे दखल घेत पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून १० जून पर्यंत १२२९ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर दिसून येत होते.मोफत शिक्षण हक्क कायदा आरटीई २५ टक्के अंतर्गतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन सोडत पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आता दुसºया फेरीचे शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात २४५ विद्यार्थ्यांपैकी १५० जणांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदeducationशैक्षणिक