शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणयाचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु पालकांच्या विनंतीनुसार परत १० जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख करण्यात आली. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत वारंवार बदल करण्यात आला. जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी परत संधी उपलब्ध करून देत १० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आॅनलाई अर्ज करताना पालकांनी पाल्यांची माहिती शासनाने दिलेल्या अटींचे पालन करून भरून घेण्याच्या तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅप करून भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले होते. आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश नाकारणाऱ्यांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी शिक्षण विभागाकडे काही पालकांनी प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे दखल घेत पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून १० जून पर्यंत १२२९ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर दिसून येत होते.मोफत शिक्षण हक्क कायदा आरटीई २५ टक्के अंतर्गतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन सोडत पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आता दुसºया फेरीचे शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात २४५ विद्यार्थ्यांपैकी १५० जणांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदeducationशैक्षणिक