शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणयाचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु पालकांच्या विनंतीनुसार परत १० जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख करण्यात आली. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत वारंवार बदल करण्यात आला. जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी परत संधी उपलब्ध करून देत १० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आॅनलाई अर्ज करताना पालकांनी पाल्यांची माहिती शासनाने दिलेल्या अटींचे पालन करून भरून घेण्याच्या तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅप करून भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले होते. आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश नाकारणाऱ्यांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी शिक्षण विभागाकडे काही पालकांनी प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे दखल घेत पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून १० जून पर्यंत १२२९ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर दिसून येत होते.मोफत शिक्षण हक्क कायदा आरटीई २५ टक्के अंतर्गतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन सोडत पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आता दुसºया फेरीचे शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात २४५ विद्यार्थ्यांपैकी १५० जणांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदeducationशैक्षणिक