शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:07 IST

वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारातील घटना

वसमत (जि. हिंगोली) : शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारात १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही या शिवारात शेकडो हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास शिवारातील वीज रोहित्रात शाॅर्टसर्किट होऊन स्फोट झाला. त्यामुळे आगीच्या ठिणग्या उसात पडल्याने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. शेतकऱ्यांनी वीज कंपनीला माहिती देत वीजपुरवठा बंद करण्यास सांगितला. परंतु, पाहता पाहता परिसरातील शेतकऱ्यांचा बारा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. शेतकरी चंद्रकांत भालेराव यांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. तर उपसरपंच प्रल्हाद भालेराव यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वसमत येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. परंतु, या घटनेत शेतकरी विश्वनाथ मुळे यांचा अडीच एकर, प्रभाकर भालेराव यांचा १ एकर, प्रल्हाद भालेराव ४ एकर, गोपीनाथ भालेराव यांचा २ एकर, नथूजी भालेराव यांचा ३ एकर, कृष्णा भालेराव यांचा २ एकर असा एकूण १२ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीज कंपनीने नुकसान भरपाई द्यावी...महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नेहमीच बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज रोहित्राच्या ठिकाणी फुटलेले फ्यूज, उघडे पडलेल्या तारा असतात. रिधोरा शिवारातील वीज रोहित्राचीही अशीच परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी अनेक वेळा दुरूस्तीची मागणी केली. परंतु, दुरुस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

३५ एकरावर होता ऊस...रिधोरा शिवारात ज्या ठिकाणी शाॅर्टसर्किटने आग लागली त्या भागात जवळपास ३५ एकरावर ऊस उभा होता. त्यापैकी १२ एकरातील ऊस जळून खाक झाला. उर्वरित क्षेत्रावरील उसालाही झळ पोहोचली असून, सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळाले. अन्यथा सर्व ऊस जळून खाक झाला असता, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोलीFarmerशेतकरी