शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:45 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व सेनगाव हे तीन तालुके तर दुष्काळग्रस्तच जाहीर केले. या तालुक्यांतील टँकरचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांनाच दिलेले आहेत. तर इतर ठिकाणच्या उपायांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येतात. यंदा टंचाईची तीव्रता लक्षात घेता सध्याच ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यात कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या ठिकाणी तर सेनगाव तालुक्यातील जयपूर, सेनगाव, कहाकर खु., औंढा तालुक्यात काळापाणी तांडा आदी ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत.सेनगाव तालुक्यात ८ खाजगी टँकर सुरू असून १९ खेपा केल्या जात आहेत. यावर १४५७0 एवढ्या लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. कळमनुरी तालुक्यात १ खाजगी तर दोन शासकीय टँकरद्वारे ८ खेपा केल्या जात आहेत. यावर ४२१९ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे.जिल्ह्यात एकूण १८ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. त्यातील टँकरसाठी ८ असून उर्वरित टँकरव्यतिरिक्त आहेत. मागील काही दिवसांपासून अधिग्रहणाचे प्रस्ताव येण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी अधिग्रहणाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याने अनेक शेतकरी आपला स्त्रोत अधिग्रहण करू देण्यास नकार देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे काही गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याने लोकप्रतिनिधींनीही झपाट्याने कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातून होणारी ओरड थांबविण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाला असला तरीही उपायांना त्या प्रमाणात गती मिळाल्याचे चित्र दिसत नाही. आता उन्हाचा कडाका वाढत असल्याने उपायांसाठी प्रशासनास सज्ज व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई