शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:45 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व सेनगाव हे तीन तालुके तर दुष्काळग्रस्तच जाहीर केले. या तालुक्यांतील टँकरचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांनाच दिलेले आहेत. तर इतर ठिकाणच्या उपायांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येतात. यंदा टंचाईची तीव्रता लक्षात घेता सध्याच ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यात कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या ठिकाणी तर सेनगाव तालुक्यातील जयपूर, सेनगाव, कहाकर खु., औंढा तालुक्यात काळापाणी तांडा आदी ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत.सेनगाव तालुक्यात ८ खाजगी टँकर सुरू असून १९ खेपा केल्या जात आहेत. यावर १४५७0 एवढ्या लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. कळमनुरी तालुक्यात १ खाजगी तर दोन शासकीय टँकरद्वारे ८ खेपा केल्या जात आहेत. यावर ४२१९ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे.जिल्ह्यात एकूण १८ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. त्यातील टँकरसाठी ८ असून उर्वरित टँकरव्यतिरिक्त आहेत. मागील काही दिवसांपासून अधिग्रहणाचे प्रस्ताव येण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी अधिग्रहणाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याने अनेक शेतकरी आपला स्त्रोत अधिग्रहण करू देण्यास नकार देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे काही गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याने लोकप्रतिनिधींनीही झपाट्याने कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातून होणारी ओरड थांबविण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाला असला तरीही उपायांना त्या प्रमाणात गती मिळाल्याचे चित्र दिसत नाही. आता उन्हाचा कडाका वाढत असल्याने उपायांसाठी प्रशासनास सज्ज व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई