शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

काळजीचं कारण... तरुणांच्या मेंदूचा आकार कमी होतोय, विस्मृतीचा धोका वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:13 IST

मानसिक तणावाचा तरुणांवर गंभीर परिणाम

मुंबई: वाढत्या मानसिक तणावाचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. तरुणांवर तर याचा अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानसिक तणावामुळे स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मेंदूतील भाग आकुंचन पावत असल्याची धक्कादायक माहिती संधोधनातून पुढे आलीय. या समस्येचा सर्वाधिक सामना तरुणांना करावा लागतोय. यामुळे तरुणांमध्ये विस्मृतीचा धोका वाढतोय. मानसिक ताण-तणावाचे मेंदू आणि स्मरणशक्तीवर होणारे परिणाम यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संशोधन केलं. यामध्ये 67 रुग्णांचा सहभाग होता. यातील नेमके कितीजण तणावाखाली आहेत?, तणावाचा शरीरावर काय परिणाम होतो?, यासाठी दीड वर्ष संधोशन करण्यात आलं. यामधून समोर आलेले निष्कर्ष अतिशय चिंताजनक आहेत. 67 पैकी 30 टक्के रुग्ण तणावाखाली असल्याचं यातून समोर आलं. स्मरणशक्तीशी निगडित असणाऱ्या 'हिपोकॅम्पस'चा आकार कमी होत असल्याची चिंताजनक माहितीदेखील यातून पुढे आली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विकास धिकव यांनी संशोधनाच्या निष्कर्षांबद्दल दिलेली माहिती चिंताजनक आहे. 'तणावाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्व रुग्णांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला. यानंतर त्यांच्या मेंदूतील हिपोकॅम्पसच्या आकाराचं मोजमाप करण्यात आलं. जे फार तणावग्रस्त नव्हते, त्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार सर्वसाधारण होता. मात्र जास्त  तणावाखाली असलेल्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार लहान झाला होता. त्यामुळेच सध्या विस्मरणाचा आजार वाढतोय. तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असेन हे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे,' असं धिकव यांनी सांगितलं.  

टॅग्स :Healthआरोग्य