शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काळजीचं कारण... तरुणांच्या मेंदूचा आकार कमी होतोय, विस्मृतीचा धोका वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:13 IST

मानसिक तणावाचा तरुणांवर गंभीर परिणाम

मुंबई: वाढत्या मानसिक तणावाचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. तरुणांवर तर याचा अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानसिक तणावामुळे स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मेंदूतील भाग आकुंचन पावत असल्याची धक्कादायक माहिती संधोधनातून पुढे आलीय. या समस्येचा सर्वाधिक सामना तरुणांना करावा लागतोय. यामुळे तरुणांमध्ये विस्मृतीचा धोका वाढतोय. मानसिक ताण-तणावाचे मेंदू आणि स्मरणशक्तीवर होणारे परिणाम यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संशोधन केलं. यामध्ये 67 रुग्णांचा सहभाग होता. यातील नेमके कितीजण तणावाखाली आहेत?, तणावाचा शरीरावर काय परिणाम होतो?, यासाठी दीड वर्ष संधोशन करण्यात आलं. यामधून समोर आलेले निष्कर्ष अतिशय चिंताजनक आहेत. 67 पैकी 30 टक्के रुग्ण तणावाखाली असल्याचं यातून समोर आलं. स्मरणशक्तीशी निगडित असणाऱ्या 'हिपोकॅम्पस'चा आकार कमी होत असल्याची चिंताजनक माहितीदेखील यातून पुढे आली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विकास धिकव यांनी संशोधनाच्या निष्कर्षांबद्दल दिलेली माहिती चिंताजनक आहे. 'तणावाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्व रुग्णांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला. यानंतर त्यांच्या मेंदूतील हिपोकॅम्पसच्या आकाराचं मोजमाप करण्यात आलं. जे फार तणावग्रस्त नव्हते, त्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार सर्वसाधारण होता. मात्र जास्त  तणावाखाली असलेल्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार लहान झाला होता. त्यामुळेच सध्या विस्मरणाचा आजार वाढतोय. तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असेन हे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे,' असं धिकव यांनी सांगितलं.  

टॅग्स :Healthआरोग्य