शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तरुण राहायचं की वृद्ध, हे तुमच्याच हातात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:48 IST

जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते.

आपण म्हातारे होतो म्हणजे आपल्या अनेक क्षमता कमी होत जातात. वय जसजसं वाढत जातं, तसतसं आपल्या क्षमतांमध्ये घट होत जाते. अर्थात याच्या उलट लहानपण आणि तरुणपण. या काळात आपल्या क्षमता वाढत असतात आणि निरंतर त्यात वाढही होत असते. तुमचा आहार, दिनचर्या आणि तुमची आरोग्यशैली, व्यायाम उत्तम असेल, तर या क्षमतेत आणखी वाढ होते; 

 

पण जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते. व्यायाम, आनंदी राहणं आणि आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या आधारावर आपल्या शरीराचा जो ऱ्हास होत असतो, तो आपण कमी करू शकतो; पणहा ऱ्हास सुरूच असतो. आपली शारीरिक क्षमता कमी होत असते, मेंदूची क्षमता कमी होत असते, आजारांचा आणि आजारांना बळी पडण्याचा धोका सातत्यानं वाढत असतो आणि आपल्या महत्त्वाच्या क्षमतांचा संक्षेप झाला की कालांतरानं आपला मृत्यू होतो; पण प्रत्येक वेळी हे बदल एकरेषीय आणि सातत्यानं होत असतात असं नाही. 

उदाहरणार्थ, समजा दोन सत्तर वर्षांचे वृद्ध घेतले तर त्या दोघांचीही शारीरिक आणि मानसिक क्षमता एकच असेल असं नाही. एखादा वृद्ध या वयातही एनर्जेटिक, उत्तम आरोग्य आणि तब्येत असलेला, उत्साही, कार्यतत्पर आणि वेगवेगळ्या आव्हानांना सतत सामोरा जाणारा असू शकतो. त्याचवेळी दुसरा वृद्ध मात्र अतिशय गर्भगळीत, आजारी, अनुत्साही, निराश, अगदी सहजपणे उठू-बसू न शकणारा तसंच इतरांच्या मदतीशिवाय काहीही करू न शकणारा असू शकतो. आपल्या आयुष्यात होणारे बदल, निवृत्त होणं, आपलं घर बदलणं, दुसऱ्या शहरात स्थलांतर करणं, ज्यांच्याबरोबर आपण उठलो-बसलो-खेळलो-वाढलो, त्या सोबत्यांचा मृत्यू होणं, आपला जीवनसाथीच आपल्याला सोडून जाणं... यासारख्या गोष्टीही तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात आणि त्यानुसारही वृद्धापकाळातलं आपलं वृद्धत्व आणि ‘तारुण्य’ अवलंबून असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरच तुमचं आनंदी किंवा दु:खी वार्धक्य अवलंबून असतं. त्यामुळे आनंदी आणि ॲक्टिव्ह वृद्धत्वाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तरुण राहायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद द्यायला आपण शिकलं पाहिजे.