शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:01 IST

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं.

- हेमांगी म्हाप्रोळकर

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं. त्यामुळे सहन करण्याची किंवा थोडं थांबण्यासाठी लागणारा वेळ द्यायची शक्ती कोणाकडेही उरलेली नाही. ही स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. सहन करण्याची पातळी इतकी खालावली आहे की मनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. एखाद्या ज्वालामुखीतील लाव्हा त्याच्या मुखाजवळ येऊन ठेपलाय आणि तो कोणत्याही क्षणी फुटून बाहेर येऊ शकेल अशा स्थितीत लोकांची मनं जाऊन पोहोचली आहेत. ही मनं कोणत्याही कारणाने उद्रेक पावतात रोजच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं आपण दररोज ज्या मार्गावरुन जातो तेथे सिग्नल आहे, तो पार करुन गेल्याशिवाय कार्यालयात जाता येणार नाही हे आपल्याला माहिती असतं. तरिही लोक ते नेहमीचे काही सेकंद थांबण्याच्या स्थितीत नसतात. मग ते उगाचच हॉर्न वाजवत बसतात किंवा सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात. काही लोक दुस-यांना ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा उगाचच कुचकामी आनंद मिळवतात, त्यातून काहीच साध्य होत नाही. मग एकप्रकारती शर्यत लागल्यासारखे मीच पुढे जाणार असा प्रकार सुरु होतो. पण ही गाडीतली शर्यत गाडीतून बाहेर आले तरी ती तुमच्या मागोमाग येत असते, मग ती शर्यतीची भावना पाठलाग करते व तुमचा स्वभावही तसाच होतो. त्याचबरोबर तडजोड हा शब्दही हळूहळू नामशेष होत चालला आहे. कित्येक जोडपी योग्य समुपदेशन नसल्यामुळे संकटात सापडलेली असतात. आत्मप्रौढी, जराही तडजोड करण्यास असलेला ठाम नकार, जोडीदारावर विश्वास नसणे तसेच संशय अशा अनेक घटकांमुळे जोडप्यांमध्ये तणाळ निर्माण होताना दिसून येतो. 

आजकाल एक सर्वात जास्त आढळणारी बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी विनाकारण स्पर्धा. स्पर्धा निकोप नसेल तर प्रश्न व ताण जन्मास येतात. प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा दुसर्याशी ताडून पाहायला लागतो. या भावनेमुळे सतत लक्ष दुसरा काय करतोय याकडेच जाऊ लागते. इतरांनी काहीही केले की मग आपल्यामध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण व्हायला लागते. माझ्याकडे समुपदेशनासाठी एक हुशार मुलगी आली होती. अत्यंत उच्चशिक्षित पी.एचडी पदवी प्राप्त आणि आई- वडिलांची एकूलते एक मूल असणा-या या मुलीला एका वेगळ्याच न्यूनगंडाने पछाडले होते. तिच्या कार्यालयात इतर लोक घालतात तसे आपण पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालत नाही, रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन पार्टी करत नाही किंवा त्यांच्यासारखे 'भारी' आपण वागत नाही म्हणजे आपण बावळट, बिनकामाचे, गटात न बसणारे आहोत असा तिने ग्रह करुन घेतला होता. दुसरे कसे वागतात त्यावर मी माझी प्रतिमा निर्माण करणार, त्यावर मी माझा आनंद, सुख-दु:ख ठरवणार असे केल्यामुळे तिच्या स्वभावावर आणि कामावर परिणाम झाला. आपल्या सर्वांना हेच टाळायचे आहे. इतर व्यक्तीच्या कामावर आपली प्रतिमा, आनंद, समाधान, मनस्थिती अवलंबून ठेवू नका.

(लेखिका मुंबईस्थित क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून शहरी जीवनातील विविध प्रश्न घेऊन येणा-या लोकांना त्यांनी मदत केली आहे.)

टॅग्स :Healthआरोग्य