शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:01 IST

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं.

- हेमांगी म्हाप्रोळकर

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं. त्यामुळे सहन करण्याची किंवा थोडं थांबण्यासाठी लागणारा वेळ द्यायची शक्ती कोणाकडेही उरलेली नाही. ही स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. सहन करण्याची पातळी इतकी खालावली आहे की मनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. एखाद्या ज्वालामुखीतील लाव्हा त्याच्या मुखाजवळ येऊन ठेपलाय आणि तो कोणत्याही क्षणी फुटून बाहेर येऊ शकेल अशा स्थितीत लोकांची मनं जाऊन पोहोचली आहेत. ही मनं कोणत्याही कारणाने उद्रेक पावतात रोजच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं आपण दररोज ज्या मार्गावरुन जातो तेथे सिग्नल आहे, तो पार करुन गेल्याशिवाय कार्यालयात जाता येणार नाही हे आपल्याला माहिती असतं. तरिही लोक ते नेहमीचे काही सेकंद थांबण्याच्या स्थितीत नसतात. मग ते उगाचच हॉर्न वाजवत बसतात किंवा सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात. काही लोक दुस-यांना ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा उगाचच कुचकामी आनंद मिळवतात, त्यातून काहीच साध्य होत नाही. मग एकप्रकारती शर्यत लागल्यासारखे मीच पुढे जाणार असा प्रकार सुरु होतो. पण ही गाडीतली शर्यत गाडीतून बाहेर आले तरी ती तुमच्या मागोमाग येत असते, मग ती शर्यतीची भावना पाठलाग करते व तुमचा स्वभावही तसाच होतो. त्याचबरोबर तडजोड हा शब्दही हळूहळू नामशेष होत चालला आहे. कित्येक जोडपी योग्य समुपदेशन नसल्यामुळे संकटात सापडलेली असतात. आत्मप्रौढी, जराही तडजोड करण्यास असलेला ठाम नकार, जोडीदारावर विश्वास नसणे तसेच संशय अशा अनेक घटकांमुळे जोडप्यांमध्ये तणाळ निर्माण होताना दिसून येतो. 

आजकाल एक सर्वात जास्त आढळणारी बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी विनाकारण स्पर्धा. स्पर्धा निकोप नसेल तर प्रश्न व ताण जन्मास येतात. प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा दुसर्याशी ताडून पाहायला लागतो. या भावनेमुळे सतत लक्ष दुसरा काय करतोय याकडेच जाऊ लागते. इतरांनी काहीही केले की मग आपल्यामध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण व्हायला लागते. माझ्याकडे समुपदेशनासाठी एक हुशार मुलगी आली होती. अत्यंत उच्चशिक्षित पी.एचडी पदवी प्राप्त आणि आई- वडिलांची एकूलते एक मूल असणा-या या मुलीला एका वेगळ्याच न्यूनगंडाने पछाडले होते. तिच्या कार्यालयात इतर लोक घालतात तसे आपण पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालत नाही, रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन पार्टी करत नाही किंवा त्यांच्यासारखे 'भारी' आपण वागत नाही म्हणजे आपण बावळट, बिनकामाचे, गटात न बसणारे आहोत असा तिने ग्रह करुन घेतला होता. दुसरे कसे वागतात त्यावर मी माझी प्रतिमा निर्माण करणार, त्यावर मी माझा आनंद, सुख-दु:ख ठरवणार असे केल्यामुळे तिच्या स्वभावावर आणि कामावर परिणाम झाला. आपल्या सर्वांना हेच टाळायचे आहे. इतर व्यक्तीच्या कामावर आपली प्रतिमा, आनंद, समाधान, मनस्थिती अवलंबून ठेवू नका.

(लेखिका मुंबईस्थित क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून शहरी जीवनातील विविध प्रश्न घेऊन येणा-या लोकांना त्यांनी मदत केली आहे.)

टॅग्स :Healthआरोग्य