शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जागतिक मानसिक आरोग्य दिन : तुमची सहनशक्ती कमी होत चालली आहे का ?- हेमांगी म्हाप्रोळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:01 IST

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं.

- हेमांगी म्हाप्रोळकर

आज मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरामध्ये सर्वांना एक विचित्र प्रकारच्या घाईने पछाडलेले आहे. प्रत्येकाला सगळं तात्काळ आणि कोणताही क्षण न दवडता काम व्हावं असं वाटतं. त्यामुळे सहन करण्याची किंवा थोडं थांबण्यासाठी लागणारा वेळ द्यायची शक्ती कोणाकडेही उरलेली नाही. ही स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. सहन करण्याची पातळी इतकी खालावली आहे की मनाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. एखाद्या ज्वालामुखीतील लाव्हा त्याच्या मुखाजवळ येऊन ठेपलाय आणि तो कोणत्याही क्षणी फुटून बाहेर येऊ शकेल अशा स्थितीत लोकांची मनं जाऊन पोहोचली आहेत. ही मनं कोणत्याही कारणाने उद्रेक पावतात रोजच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं आपण दररोज ज्या मार्गावरुन जातो तेथे सिग्नल आहे, तो पार करुन गेल्याशिवाय कार्यालयात जाता येणार नाही हे आपल्याला माहिती असतं. तरिही लोक ते नेहमीचे काही सेकंद थांबण्याच्या स्थितीत नसतात. मग ते उगाचच हॉर्न वाजवत बसतात किंवा सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात. काही लोक दुस-यांना ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा उगाचच कुचकामी आनंद मिळवतात, त्यातून काहीच साध्य होत नाही. मग एकप्रकारती शर्यत लागल्यासारखे मीच पुढे जाणार असा प्रकार सुरु होतो. पण ही गाडीतली शर्यत गाडीतून बाहेर आले तरी ती तुमच्या मागोमाग येत असते, मग ती शर्यतीची भावना पाठलाग करते व तुमचा स्वभावही तसाच होतो. त्याचबरोबर तडजोड हा शब्दही हळूहळू नामशेष होत चालला आहे. कित्येक जोडपी योग्य समुपदेशन नसल्यामुळे संकटात सापडलेली असतात. आत्मप्रौढी, जराही तडजोड करण्यास असलेला ठाम नकार, जोडीदारावर विश्वास नसणे तसेच संशय अशा अनेक घटकांमुळे जोडप्यांमध्ये तणाळ निर्माण होताना दिसून येतो. 

आजकाल एक सर्वात जास्त आढळणारी बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी विनाकारण स्पर्धा. स्पर्धा निकोप नसेल तर प्रश्न व ताण जन्मास येतात. प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा दुसर्याशी ताडून पाहायला लागतो. या भावनेमुळे सतत लक्ष दुसरा काय करतोय याकडेच जाऊ लागते. इतरांनी काहीही केले की मग आपल्यामध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण व्हायला लागते. माझ्याकडे समुपदेशनासाठी एक हुशार मुलगी आली होती. अत्यंत उच्चशिक्षित पी.एचडी पदवी प्राप्त आणि आई- वडिलांची एकूलते एक मूल असणा-या या मुलीला एका वेगळ्याच न्यूनगंडाने पछाडले होते. तिच्या कार्यालयात इतर लोक घालतात तसे आपण पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालत नाही, रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन पार्टी करत नाही किंवा त्यांच्यासारखे 'भारी' आपण वागत नाही म्हणजे आपण बावळट, बिनकामाचे, गटात न बसणारे आहोत असा तिने ग्रह करुन घेतला होता. दुसरे कसे वागतात त्यावर मी माझी प्रतिमा निर्माण करणार, त्यावर मी माझा आनंद, सुख-दु:ख ठरवणार असे केल्यामुळे तिच्या स्वभावावर आणि कामावर परिणाम झाला. आपल्या सर्वांना हेच टाळायचे आहे. इतर व्यक्तीच्या कामावर आपली प्रतिमा, आनंद, समाधान, मनस्थिती अवलंबून ठेवू नका.

(लेखिका मुंबईस्थित क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून शहरी जीवनातील विविध प्रश्न घेऊन येणा-या लोकांना त्यांनी मदत केली आहे.)

टॅग्स :Healthआरोग्य