शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : मानसिक लवचिकता शिकता आली पाहिजे- डॉ. ओंकार जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 17:22 IST

जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

ठळक मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी.

''डॉक्टर , हल्ली अनय (नाव बदललं आहे)  फारच उदास झालाय, काही करायचचं नाही म्हणतो. दहावीची परीक्षाही नको म्हणतोय'' अनयची आई सांगत होती. त्याचं झालं असं की अनय सुरुवातीपासूनच हुशार, हरहुन्नरी. शाळेत सगळ्या स्पर्धा, डान्स, खेळ यात अग्रेसर असायचा. मागच्या महिन्यात तो फुटबॉल खेळताना पडला. डॉक्टरांनी दोन महिने आराम सांगितला. त्यात त्याचा बराच अभ्यास बुडाला. आता तो काहीच नको म्हणतोय. अगदी परीक्षासुद्धा नको म्हणतोय. हे सगळं ऐकल्यावर मी अनयशी बोलायचं ठरवलं.

अनयशी बोलल्यावर लक्षात आले की तो मानसिक ताणामुळे निराश झालाय. अनयने सगळ्या क्षेत्रात यशस्वी व्हायलाच हवं असा पालकांचा आग्रह. त्यामुळे वेगवेगळे क्लास, स्पर्धा आणि मग दहावीची तयारी हे सगळ सांभाळताना त्याची दमछाक झाली . हल्ली अनेक तरुण मुलांशी बोलताना हे लक्षात येते की ते सतत कोणत्या न कोणत्या मानसिक ताण तणावात असतात. आपण सगळीकडे बेस्ट असलंच पाहिजे या नादात मग सगळच चुकत जातं. नोकरी , लग्न, स्पर्धा परीक्षा, घर या सगळ्याच्या ताणाला सामोरे जाताना नैराश्य, एकटेपणा, न्यूनगंड या भावना वाढीस लागतात. त्यातूनच तरुणांच्या होणारया आत्महत्या ही एक चिंतेची बाब झाली  आहे म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

पण या सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी. अनयच्या बाबतीतचं बघा ना. मला सगळ्याचं गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्यात मी यशस्वी झालोच पाहिजे हा हट्ट, दुराग्रह काय कामाचा ? सर्वप्रथम मी माणूस आहे. काही गोष्टी मला चांगल्या येतात आणि काही नाही हा आत्मस्वीकार करायला हवा. एखाद्या गोष्टीच्या यशापयशापेक्षाही ती करताना मिळणारा आनंद तेवढाच महत्वाचा. असं झाल्यास मग नोकरी, परीक्षा, प्रेम इत्यादी मध्ये अपयश आल्यास  टोकाच्या नकारात्मक भावना येणार नाहीत आणि यशाने 'हुरळून’ जायला होणार नाही.

जेव्हा तणाव जास्त असेल तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला लाजायचे कारण नाही.जसा हात मोडला तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जातो तसंचं मन दुखावलं तर त्या तज्ज्ञ माणसाकडे नको का जायला ? योग्य मानसोपचार , औषधे, व्यायाम , आहार, समुपदेशन या सगळ्यांच्या मदतीने मानसिक आजार बरे होतात. आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे जण फक्त निरोगीच नव्हे तर सुदृढ मनाकडे झेपावण्याचा संकल्प करुया. शुभेच्छा!

(लेखक शिर्डी येथील मन आरोग्य केंद्र येथे मानसोपचारतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Healthआरोग्य